pakistan political crisis relations with india will not normalize unless kashmir issue is resolve says shehbaz sharif
इम्रान खान यांची पाकिस्तानच्या सत्तेतून हकालपट्टी करण्यात आली असून माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ शाहबाज शरीफ हे नवे वझीर-ए-आझम बनण्याच्या मार्गावर आहेत. सोमवारी पाकिस्तानच्या संसदेत नव्या पंतप्रधानांची घोषणा होणार आहे. शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान होण्यापूर्वीच आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. जोपर्यंत काश्मीर प्रश्न सुटत नाही तोपर्यंत भारतासोबत कोणतीही चर्चा होणार नसल्याचे शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानचे राजकारण भारतापासून सुरू होते आणि भारतावर वक्तव्ये करून संपते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. आपली सत्ता गमावण्याच्या भीतीने जनतेला वारंवार संबोधित करताना इम्रान खान यांनी भारताचे कौतुक केले, तर दुसरीकडे नवे पंतप्रधान होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या शाहबाज शरीफ यांनी भारताविरोधात वक्तव्य केले आहे. पंतप्रधानपदाचे नामांकन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना शाहबाज शरीफ म्हणाले की, जोपर्यंत काश्मीर प्रश्न सुटत नाही तोपर्यंत भारतासोबत कोणतीही चर्चा होणार नाही.
दरम्यान, पाकिस्तान सध्या राजकीय संकटाव्यतिरिक्त महागाई, वाढती बेरोजगारी आणि ट्रिलियन्सचे विदेशी कर्ज यांच्याशी झगडत आहे. इम्रान खान यांच्यानंतर शाहबाज शरीफ यांच्यासमोर पाकिस्तानला खंबीरपणे उभे करणे हे नवे आव्हान आहे. परंतु, आपल्या लोकांना नोकऱ्या देण्याऐवजी आणि महागाई नियंत्रणात आणून देशाच्या आर्थिक बळावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ते काश्मीर मुद्द्यावर गप्पा मारत आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…