ग्लोबल

शाहबाज शरीफ यांनी दाखवले खरे रंग, पाकिस्तानचे नवे पंतप्रधान बनण्याआधीच काश्मीर मुद्द्यावर केले ‘हे’ वक्तव्य

इम्रान खान यांची पाकिस्तानच्या सत्तेतून हकालपट्टी करण्यात आली असून माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे भाऊ शाहबाज शरीफ हे नवे वझीर-ए-आझम बनण्याच्या मार्गावर आहेत. सोमवारी पाकिस्तानच्या संसदेत नव्या पंतप्रधानांची घोषणा होणार आहे. शाहबाज शरीफ यांनी पंतप्रधान होण्यापूर्वीच आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली आहे. जोपर्यंत काश्मीर प्रश्न सुटत नाही तोपर्यंत भारतासोबत कोणतीही चर्चा होणार नसल्याचे शाहबाज शरीफ यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानचे राजकारण भारतापासून सुरू होते आणि भारतावर वक्तव्ये करून संपते, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. आपली सत्ता गमावण्याच्या भीतीने जनतेला वारंवार संबोधित करताना इम्रान खान यांनी भारताचे कौतुक केले, तर दुसरीकडे नवे पंतप्रधान होण्याच्या दिशेने वाटचाल करत असलेल्या शाहबाज शरीफ यांनी भारताविरोधात वक्तव्य केले आहे. पंतप्रधानपदाचे नामांकन केल्यानंतर माध्यमांशी बोलताना शाहबाज शरीफ म्हणाले की, जोपर्यंत काश्मीर प्रश्न सुटत नाही तोपर्यंत भारतासोबत कोणतीही चर्चा होणार नाही.

दरम्यान, पाकिस्तान सध्या राजकीय संकटाव्यतिरिक्त महागाई, वाढती बेरोजगारी आणि ट्रिलियन्सचे विदेशी कर्ज यांच्याशी झगडत आहे. इम्रान खान यांच्यानंतर शाहबाज शरीफ यांच्यासमोर पाकिस्तानला खंबीरपणे उभे करणे हे नवे आव्हान आहे. परंतु, आपल्या लोकांना नोकऱ्या देण्याऐवजी आणि महागाई नियंत्रणात आणून देशाच्या आर्थिक बळावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी ते काश्मीर मुद्द्यावर गप्पा मारत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

1 आठवडा ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

1 आठवडा ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

1 आठवडा ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

1 आठवडा ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

1 आठवडा ago

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…

1 आठवडा ago