ग्लोबल

जगभरातील शक्तिशाली देशांच्या यादीतील स्थान भारताने गमावले

जगभरातील शक्तिशाली देशांची यादी जाहीर झाली असून भारताच्या स्थानात दोन अंकानी घसरण झाली आहे. यावर्षीही अमेरिका जगातील सगळ्यात पॉवरफूल देश असून पहिल्या स्थानी आहे. सिडनी येथील लोवी इन्स्टिट्यूटच्या एशिया पॉवर इंडेक्स २०२० नुसार २०१९ मध्ये भारताचा पॉवर स्कोअर ४१.० होता. तर, यावर्षी या गुणात घट झाली असून ३९.७ टक्के इतके झाले आहे. या यादीत पॉवर स्कोअर ४० हून अधिक असलेल्या देशांचा समावेश सर्वाधिक शक्तिशाली देशांमध्ये होतो. त्यामुळे मागील वर्षी भारताचा समावेश या यादीत होता.

लोवी इन्स्टिट्यूटने सांगितले की, आशियातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या दुसऱ्या क्रमांकाचा देश या यादीतून बाहेर गेला आहे. भारताचा समावेश आता मध्यम शक्तिशाली देशांच्या यादीत करण्यात आला आहे. येत्या काही वर्षात भारताचा या यादीत पुन्हा समावेश होऊ शकतो. इंडो-पॅसिफिक भागातील देशांमध्ये भारताने करोनाच्या संसर्गामुळे विकास करण्याची क्षमता गमावली असल्याचे या अहवालात म्हटले आहे.

अहवालानुसार, काही वर्षानंतर लोकसंख्येच्या बाबतीत भारत चीनला मागे टाकू शकतो. भारतात करोनाच्या संसर्गामुळे दोन्ही देशांदरम्यानची असमानता वाढली आहे. या दशकाच्या अखेरपर्यंत भारत चीनच्या एकूण आर्थिक उत्पादनाच्या केवळ ४० टक्केच पोहचू शकतो. तर, २०१९ आधी ही शक्यता ५० टक्के इतकी वर्तवण्यात आली होती.

थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

4 दिवस ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

4 दिवस ago

जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे.…

4 दिवस ago

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारसोबत समन्वय

मुंबई : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य…

4 दिवस ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध सामंजस्य करार

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये…

2 आठवडे ago

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : महिलांवरील अत्याचार, छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे अधिक…

4 आठवडे ago