मनोरंजन

प्रसिद्ध गायक दिलजान याचा भीषण अपघातात मृत्यू

प्रसिद्ध पंजाबी गायक दिलजान याचे अपघातात निधन झाले. तो ३१ वर्षांचा होता. दिलजान अमृतसरहून करतारपूरकडे येत असताना जंडियाला गुरु येथे मंगळवारी पहाटे 2 वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे त्याच्या चाहत्यांवर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमृतसर-जालंधर जीटी रोडवरील जंडियाला गुरु पुलाजवळ दिलजानची कार पार्क केलेल्या एका ट्रकला आदळली. त्यावेळी दिलजान गाडीत एकटा होता. त्याच्या कारचा वेग खूप जास्त होता. त्याची कार अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या ट्रकला आदळली. अपघातानंतर दिलजानला तात्काळ जवळच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. परंतु, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.

दिलजनाचे वडील मदन मदार यांनी सांगितले की, “दिलजानाचे नवीन गाणे 2 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. सोमवारी तो या संदर्भातील बैठकीसाठी आपल्या कारमधून अमृतसरला गेला होता. रात्री उशिरा परतत असताना हा अपघात झाला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.”

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

1 आठवडा ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

1 आठवडा ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

1 आठवडा ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

1 आठवडा ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

1 आठवडा ago

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…

1 आठवडा ago