मुंबई : लोकप्रिय मालिका ‘रामायण’मधील रावणाची भूमिका साकारणारे अभिनेते अरविंद त्रिवेदी यांचं निधन झालं. ते ८२ वर्षांचे होते. हृदयविकाराच्या झटक्यानं मंगळवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. अरविंद त्रिवेदी गेल्या बऱ्याच काळापासून प्रकृतीच्या समस्यांचा सामना करत होते. अनेक दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. अरविंद त्रिवेदी यांचे पुतणे कौस्तुभ त्रिवेदी यांनी अरविंद त्रिवेदी यांच्या निधनाच्या बातमीला दुजोरा दिला.
अरविंद त्रिवेदी यांचा जन्म मध्य प्रदेशातील उज्जैन शहरात झाला. गुजराती रंगभूमीपासून त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. अरविंद त्रिवेदी यांनी गुजराती भाषेत धार्मिक आणि सामाजिक चित्रपटांद्वारे जवळपास 40 वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन केले. त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्यांना अनेक पुरस्कारही मिळाले होते. 1987 मध्ये दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘रामायण’मध्ये त्यांनी दमदार कामगिरी केली. अरविंद त्रिवेदी यांनी ‘विक्रम और वेताल’ या टीव्ही मालिकेतही काम केले होते.
अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…
मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…
सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…
मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…