अर्थकारण

ATM मधून पैसे आलेच नाहीत, तर RBI कडे ‘या’ क्रमांकावर करू शकता तक्रार

नवी दिल्ली : भारतीय रिझर्व्ह बँकेने एटीएमसंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे. आरबीआयने म्हटले आहे की ज्या बँकेच्या एटीएममध्ये पैसे नसतील, त्यांच्याकडून दहा हजार रुपये दंड आकारला जाईल. या परिस्थितीत ग्राहक रिझर्व्ह बँकेच्या सोशल मीडिया अकाऊंटवर किंवा फोन नंबर 011-23711333 वर कॉल करून तक्रार करू शकतात.

देशातील सर्वात मोठ्या बँकेने व्हाईट लेबल एटीएम ऑपरेशनसाठी नियम जारी केले आहेत. WLAO कंपन्यांच्या माध्यमातून ATM मध्ये पैसे टाकले जातात. RBI ने सूचना दिल्या आहेत की ATM मध्ये पैसे संपणार नाहीत याची बँकांना काळजी घ्यावी लागेल. नियम न पाळणाऱ्या बँकेकडून दंड आकारला जाईल. हा नियम 1 ऑक्टोबर 2021 पासून लागू होणार आहे.

आरबीआयचे निर्देश

आरबीआयने म्हटले आहे की एटीएममध्ये पैसे संपणार नाहीत, याची खात्री बँकांना करावी लागेल. यासाठी बँका आणि डब्ल्यूएलएओला वॉच ठेवावा लागेल. पैसे संपल्यानंतर एटीएममध्ये रोख रक्कम लवकरात लवकर जमा करावी, जेणेकरून जनतेला कोणत्याही समस्येला सामोरे जावे लागणार नाही. अन्यथा ग्राहक रिझर्व्ह बँकेकडे तक्रार करू शकतो.

जर बँकेला किंवा डब्ल्यूएलएओला दंडाच्या विरोधात अपील करायचे असेल तर क्षेत्रीय कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. यासाठी एक महिन्याच्या आत अपील दाखल करावे लागेल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

1 दिवस ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

2 महिने ago