अर्थकारण

बँकांचे व्यवहार आता महाग होणार, दरांमध्ये वाढ करण्यास RBI ची मंजुरी

मुंबई : बँकांच्या एटीएममधून पैसे काढणं आता महाग होणार आहे. रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाने सर्व बॅंकांना एटीएम व्यवहारांवर लावण्यात येणाऱ्या किंमतींमध्ये वाढ करण्याची परवानगी दिली आहे. यामध्ये कस्टमर चार्ज आणि गैर बँकिंग चार्जचा देखील समावेश आहे. दोन बँकांमधील इंटरचेंज चार्जमध्येही वाढ करण्यास मंजुरी दिली असल्याने आता फ्री लिमिटपेक्षा जास्त वेळा ट्रान्झॅक्शन केल्यास जास्तीचे पैसे आकारले जाणार आहेत. हा नवा नियम 1 ऑगस्ट 2021 पासून लागू होईल.

सध्या मेट्रो शहरात महिन्याला तीन ट्रान्झॅक्शन आणि इतर शहरात पाच ट्रान्झॅक्शन फ्री देण्यात येत आहेत. त्यापेक्षा अधिक ट्रान्झॅक्शनवर ग्राहकाला 20 रुपये कस्टमर चार्ज लावण्यात येतो. आता हा कस्टमर चार्ज 21 रुपये करण्यात आला आहे. आरबीआयने सर्व बँकांच्या एटीएमवरील आर्थिक ट्रान्झॅक्शनवरील सध्याची इंटरचेंज फी 15 रुपयांवरुन वाढवून ती 17 रुपये केली आहे. त्याचप्रमाणे गैर आर्थिक ट्रान्झॅक्शनसाठी म्हणजे आपल्या खात्यावरील बॅलेन्स चेक करणे किंवा तशा प्रकारची कामं यासाठी असणारी फी 5 रुपयांवरुन 6 रुपये करण्यात आली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago