क्राईम

नागपुरात दिवसाढवळ्या हत्येची घटना, फुटपाथवर दुकान थाटण्यावरून झालेल्या वादातून भयंकर कृत्य

नागपूर : नागपूरच्या रामनगर चौकात दिवसाढवळ्या हत्येची भयंकर घटना घडली आहे. फुटपाथवरील दुकान थाटण्यावरून सुरु झालेला वाद एका व्यक्तीच्या जीवावर बेतला आहे. भररस्त्यात भाजी विक्रेत्याने त्याच्या एका साथीदारासह गॅरेज चालकाची हत्या केली. मृत व्यक्तीचे नाव विशाल निकोसे (वय ३७, रा. पांढराबोडी) असे आहे. पोलिसांनी याप्रकरणी एकाला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नागपुरातील अंबाझरी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या रामनगर चौकात ही घटना घडली. आरोपींमध्ये किशन रमेश तिवारी आणि त्याचा मित्र निलेश सरोदे यांचा समावेश आहे. विशाल हा गेल्या १८ वर्षांपासून रामनगर येथील फूटपाथवर गॅरेज चालवत होता, तर आरोपी किशन तिवारी हा गेल्या ७ वर्षांपासून त्याच्या शेजारी भाजीचं दुकान चालवत होता. मात्र, गेल्या वर्षभरापासून दोघांचाही जागेवरून वाद सुरू होता. शुक्रवारी दुपारीही त्यांच्यात वाद झाला आणि याच वादातून किशनने त्याचा मित्र नीलेश याच्यासोबत मिळून लोखंडी रॉडने विशालवर हल्ला केला. यात विशालच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. विशाल घटनास्थळी रक्तबंबाळ झाला आणि यातच त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एकाला ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. हा प्रकार कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी एक गंभीर इशारा आहे.

थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

6 दिवस ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

6 दिवस ago

जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे.…

6 दिवस ago

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारसोबत समन्वय

मुंबई : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य…

6 दिवस ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध सामंजस्य करार

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये…

3 आठवडे ago

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : महिलांवरील अत्याचार, छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे अधिक…

4 आठवडे ago