उत्तर प्रदेश : अमेठीमध्ये गुरुवारी एका शाळेतील शिक्षकाच्या संपूर्ण कुटुबांची हत्या एका माथेफिरूने केली. हे धक्कादायक प्रकरण प्रेमप्रकरणातून झाल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य संशयित म्हणून चंदन वर्माची ओळख पटवली असून शिक्षकाची बायको आणि चंदन एकमेकांच्या संपर्कात होते, अशी माहिती मिळाली आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. एका सरकारी शाळेतील शिक्षक सुनील कुमार (३४) यांना १८ ऑगस्ट रोजी त्यांच्या पत्नीच्या प्रेमसंबंधांची माहिती मिळाली होती. चंदन त्यांच्या कुटुंबाला त्रास देत होता. त्यामुळे त्यांनी पत्नीला चंदनविरुद्ध एससी/एसटी कायद्यांतर्गत एफआयआर नोंदवायला सांगितले. चंदनने कुटुंबाला धमकी दिल्याचा आरोप एफआयआरमध्ये केला गेला. तसंच, आमच्या कुटुंबाला कोणतीही इजा झाल्यास चंदनला जबाबदार धरण्यात यावं, असंही तक्रारीत नमूद केलेलं होतं. ही तक्रार केल्यानंतर शिक्षकाची पत्नी आणि चंदन एकमेकांच्या संपर्कात नव्हते. परंतु, काही दिवसांनी चंदनने त्यांच्या कुटुंबाला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात केली. सुनील यांच्याशी लग्न करण्यापूर्वी त्यांच्या पत्नीचे चंदनबरोबर प्रेमसंबंध होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.
गुरुवारी चंदनने सुनील यांच्या घरी जाऊन सुनील, त्यांची पत्नी आणि दोन मुलींची हत्या केली. त्याने सुनील यांना तीन, त्यांच्या पत्नीला दोन आणि दोन्ही मुलींना प्रत्येकी एक गोळी झाडली. धक्कादायक बाब म्हणजे या माथेफिरूने हत्या करण्यापूर्वी स्टेटसला ठेवले होते की आज पाच लोकांचा मृत्यू होईल. दरम्यान, हे हत्याकांड होत असताना जवळच मेडिकल स्टोअर चालवणाऱ्या राम मनोहर यादव यांना गोळीबाराचा आवाज आला. त्यामुळे त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना सुनील यांचं संपूर्ण कुटुंब रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं आढळलं आणि त्यांनी तत्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली. सुनील आणि त्याची पत्नी अंगणातील नळाजवळ मृतावस्थेत पडले होते. तर त्यांच्या दोन्ही मुली तिथेच १० फूट अंतरावर पडल्या होत्या.
शिक्षक होण्यापूर्वी सुनीलने युपी पोलिसांत काम केले होते. १२ मार्च २०२१ पासून ते अमेठीतील पन्हौना प्राथमिक शाळेत शिकवत होते. सुनीलचे वडील राम गोपाल यांच्या तक्रारीवरून चंदनविरोधात खुनाच्या आरोपाखाली एफआयआर नोंदवला आहे. सुनील कुमार यांचे वडील राम गोपाल कुमार यांनी संताप व्यक्त करत म्हटले कि, “ज्या पद्धतीने माझ्या मुलाचा मृत्यू झाला आहे, त्याचप्रमाणे आरोपीचा मृत्यू झाला पाहिजे.”
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…