The two brutally murdered a 15-year-old vegetable seller
झारखंड : झारखंडमधील हेमंत सरकार गुन्हेगारी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहे. यातच पोलिसांनी मंगळवारी जमशेदपूर येथील दुहेरी हत्याकांडाचा उलगडा केला. पूर्व सिंगभूम जिल्ह्यातील जमशेदपूर येथे रविवारी झालेल्या दुहेरी हत्याकांडाचा पोलिसांनी मंगळवारी छडा लावला. एका 15 वर्षांच्या मुलीने तिच्या 37 वर्षीय प्रियकरासह तिच्या आई-वडिलांना हातोडा आणि प्रेशर कुकरने मारहाण करून ठार केल्याचे पोलिसांनी उघड केले.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी एल्को पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मॅनिफिट येथील जोडप्याचे मृतदेह त्यांच्याच घरी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केल्यानंतर त्यांची 15 वर्षांची मुलगी बेपत्ता असल्याचे समोर आले. त्यानंतर संशयाच्या आधारे शोधाशोध केली असता या तरुणीला त्याच्या प्रियकरासोबत ताब्यात घेण्यात आलं. त्यांना मंगळवारी सकाळी बिरसानगर येथील ओमनगरमध्ये राहणारा तिचा प्रियकर सलितकुमार याच्यासोबत त्याच्या भाड्याच्या घरातून पकडण्यात आले.
पोलिस अधीक्षक (शहर) के विजय शंकर यांनी 24 तासांपेक्षा कमी कालावधीत या प्रकरणाची उकल केल्याचा दावा केला आणि सांगितले की मुलगी रविवारी रात्री तिच्या प्रियकरासह घरातून पळून जाऊन लग्न करणार होती, परंतु तिचे पालक जागे झाले. त्यानंतर आई-वडिलांनी तिला बाहेर जाण्यापासून थांबवले असता दोघांनी हातोड्याने व प्रेशर कुकरने त्यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर तरुणी प्रियकरासह स्कूटरवरून पळून गेली. एसएसपी प्रभात कुमार यांनी मंगळवारी याबाबत खुलासा केला. ते म्हणाले कि, गुन्हेगाराला तुरुंगात पाठवण्यात आले आहे. तसेच, अल्पवयीन मुलीला रिमांड होममध्ये पाठवले जाईल. गुन्हेगारांच्या सांगण्यावरून एक हातोडा, रक्ताने माखलेला प्रेशर कुकर आणि स्कूटर जप्त करण्यात आली आहे. आरोपींविरुद्ध आयपीसीच्या संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…
मुंबई : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)…
मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि…
मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत, सात…
मुंबई : ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करून…