kajwa festival in maharashtra
पुणे : रात्रीच्या वेळी दिसणारे काजवे प्रत्येकासाठी आकर्षण असतात. तसेच काजव्यांचा समून दिसणे ही तर एक पर्वणीच ठरते. क्वचितच असे प्रसंग घडतात. जून महिन्यात अनेक ठिकाणी ‘काजवा महोत्सव’ सुरू होतात. या ठिकाणी भेट देऊन तुम्ही काजव्यांच्या असंख्य समूहांना एकत्र पाहण्याचा आनंद घेऊ शकता.
आपण अनेकदा चित्रपटांमध्ये काजव्यांचे समूह पाहिले असतील. रात्रीच्या वेळी दिसणाऱ्या काजव्यांचा समूह पाहणे एक पर्वणीच असते. परंतु आता तुम्ही प्रत्यक्षात अशा क्षणांचा आनंद घेऊ शकता. कारण जून महिन्यात महाराष्ट्रात काही ठिकाणी ‘फायरफ्लाइज फेस्टिव्हल म्हणजेच काजवा महोत्सव सुरू होतो. तुम्हाला या महोत्सवाचा आनंद घ्यायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला त्याविषयी माहिती देत आहोत. हा महोत्सव जून अखेरपर्यंत सुरु राहतो.
महाराष्ट्रातील राजमाची गाव, सिद्धगड वाडी, प्रबळमाची गाव, भंडारदरा, घाटघर, कोथळीगड, कोंढाणे लेणी आणि पुरुषवाडी यांसह अनेक ठिकाणी महिनाभर चालणाऱ्या या महोत्सवासाठी शिबिरे आयोजित केली जातात. अशा परिस्थितीत पर्यटक येथे जाऊन हा महोत्सव पाहू शकतात आणि रात्री ट्रेकिंग, हायकिंग आणि कॅम्पिंगचा आनंद घेऊ शकतात. काजवे हे निसर्गाचे असे वरदान आहे ज्याच्या प्रकाशाने दऱ्या-खोरे आणि जंगले उजाळून निघतात.
जाणून घ्या कोठे, कधीपर्यंत सुरू असतात काजवा महोत्सव? (तारखा अंदाजे आहेत? साधरणतः मे-जून मध्ये असतात)
तुम्हालाही शहराच्या प्रकाश आणि प्रदूषणापासून दूर जाऊन काजव्यांच्या प्रकाशाचा आनंद घ्यायचा असेल तर या उत्सवाचा एक भाग व्हा आणि येथे कॅम्पिंगपासून ट्रेकिंगपर्यंतच्या कार्यक्रमांचा आनंद घ्या. या ठिकाणी तुम्हाला काजव्यांचा हळूवार आणि तालबद्ध वावर पाहायला मिळणार आहे. हे काजवे पावसाळ्यापूर्वी लाखोंच्या संख्येने बाहेर पडू लागतात आणि याच काळात त्यांची संततीही वाढवतात. मानवी हस्तक्षेपामुळे काही ठिकाणी काजव्यांची संख्या कमी होत आहे. परंतु राज्यातील या काही ठिकाणी अजूनही काजवे मोठ्या संखेने पाहायला मिळतात. पुढच्या वर्षी नक्की प्लॅन करा…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…