ICC T20 World Cup 2022: BCCI Announces Team India Squad, Rohit Sharma To Lead
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) सोमवारी (१२ सप्टेंबर) आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी संघाची घोषणा केली. जसप्रीत बुमराह आणि हर्षल पटेल हे अनुभवी वेगवान गोलंदाज संघात परतले आहेत. मोहम्मद शमी आणि दीपक चहर यांची निवड झालेली नाही. 15 जणांच्या संघात रवींद्र जडेजाही नाही, दुखापतीमुळे तो संघाचा भाग असणार नाही. आशिया चषकादरम्यान जडेजाला दुखापत झाली होती. त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली असून सुमारे चार ते पाच महिने तो खेळू शकणार नाही. जडेजाच्या जागी अक्षर पटेलची निवड करण्यात आली आहे.
संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (डब्ल्यूके), दिनेश कार्तिक (डब्ल्यूके), हार्दिक पंड्या, रविचंद्रन अश्विन, युझवेंद्र चहल, अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंग.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…