Virat's decision is pure madness, criticism of the former Indian bowler
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असलेल्या टीम इंडियाला सलग दुसऱ्या वन-डे सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. ३ वन-डे सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलियाने २-० अशी विजयी आघाडी घेतली. दोन्ही सामन्यांमध्ये भारतीय गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक राहिली. दुसऱ्या सामन्यात विराटने मयांक अग्रवालचा सहावा गोलंदाज म्हणून वापर केला.
सहावा गोलंदाज म्हणून मयांकचा वापर करण्याच्या विराटच्या निर्णयावर माजी भारतीय गोलंदाज डोड्डा गणेश यांनी टीका केली आहे. गणेश यांनी ट्विट करत म्हटलं कि, विराटचा हा निर्णय म्हणजे निव्वळ वेडेपणा आहे. ते म्हणाले, “मयांकला मी १९ वर्षाखालील संघाकडून खेळत असताना पाहतो आहे. कर्नाटक मधल्या टीम मॅनेजमेंटने कधीही मयांकचा गोलंदाज म्हणून विचार केला नाही. मी त्याला फार क्वचितवेळा नेट्समध्ये गोलंदाजी करताना पाहिलं आहे, आणि तोच आज भारताचा सहावा गोलंदाज आहे.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…