India VS West Indies
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या आणि शेवटच्या वनडेमध्ये रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाने प्लेइंग इलेव्हनमध्ये 3 बदल केले आहेत. केएल राहुलच्या जागी शिखर धवन, दीपक हुडाच्या जागी श्रेयस अय्यर आणि युजवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादव यांना संधी मिळाली आहे. कायरन पोलार्ड अजूनही तंदुरुस्त नाही आणि त्याच्या जागी निकोलस पूरन संघाचे नेतृत्व करत आहे.
दोन्ही संघ पुढीलप्रमाणे-
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, प्रसिद्ध कृष्णा, मोहम्मद सिराज
वेस्ट इंडिज – शाई होप (विकेटकीपर), ब्रँडन किंग, डॅरेन ब्राव्हो, शमर ब्रूक्स, निकोलस पूरन (कर्णधार), जेसन होल्डर, हेडन वॉल्श, फॅबियन ऍलन, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, केमार रोच.
83 नंतर प्रथमच क्लीन स्वीप करण्याची संधी
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पहिली एकदिवसीय मालिका 1983 मध्ये खेळली गेली होती, तेव्हापासून दोन्ही देशांदरम्यान एकूण 21 एकदिवसीय मालिका खेळल्या गेल्या आहेत आणि भारत WI विरुद्ध एकदाही क्लीन स्वीप करू शकला नाही. मात्र, वेस्ट इंडिजने ५० षटकांच्या फॉरमॅटमध्ये भारताविरुद्ध ३ वेळा क्लीन स्वीप केला आहे. तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित आणि कंपनीला शेवटचा सामना जिंकून इतिहास रचण्याची संधी असेल.
संघात मोठे बदल
तिसऱ्या सामन्यासाठी कर्णधार रोहित शर्माने भारतीय संघात तीन बदल केले आहेत. दुखापतग्रस्त उपकर्णधार केएल राहुलच्या जागी शिखर धवनचे पुनरागमन झाले आहे, तर दीपक हुडाच्या जागी श्रेयस अय्यरची प्लेइंग इलेव्हनमध्ये निवड करण्यात आली आहे. जवळपास 6 महिन्यांनंतर वनडे संघात पुनरागमन करणाऱ्या कुलदीप यादवला पहिल्या दोन सामन्यात 5 बळी घेणाऱ्या युजवेंद्र चहलच्या जागी खेळण्याची संधी मिळाली आहे.
मालिका गमावल्यानंतर वेस्ट इंडिजचा संघ शेवटच्या सामन्यात आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. पहिल्या दोन सामन्यांमध्ये संघ खेळाच्या प्रत्येक विभागात विखुरलेला दिसत होता. भारत दौऱ्यापूर्वी आयर्लंडने 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतही विंडीजचा 2-1 असा पराभव केला होता.
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…
मुंबई : जलसंधारण महामंडळ आणि शासन अंतर्गत प्रकल्पांच्या बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाचे पैसे तातडीने देण्याच्या सूचना…
मुंबई : नाशिक येथील बजाज इलेक्ट्रिक कंपनीतील ४१ कायमस्वरूपी कामगारांना व्यवस्थापनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता…
मुंबई : प्रतिकूल परिस्थितीवर मात करत बालगृहातील ७१५ विद्यार्थ्यांनी दहावीत यश संपादन करत सकारात्मक जीवनाचा…