क्रीडा

श्रेयस अय्यरला दुखापतीतून बाहेर येण्यासाठी लागणार मोठा कालावधी, IPL मधून बाहेर

भारतीय फलंदाज श्रेयस अय्यरच्या प्रकृतीबाबतचे नवे अपडेट आले आहेत. इंग्लंडविरुद्ध झालेल्या पहिल्या वनडे सामन्यात श्रेयसच्या खांद्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तो वनडे मालिकेत खेळू शकणार नाही, असे बीसीसीआयने स्पष्ट केले होते. आता मिळालेल्या नवीन अपडेटनुसार, ९ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आयपीएलच्या १४व्या हंगामात श्रेयस खेळू शकणार नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, श्रेयस अय्यरची दुखापत गंभीर असून त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. त्यामुळे तो आयपीएलच्या फक्त पहिल्या सत्रात नाही तर पूर्ण स्पर्धेतून बाहेर होणार आहे. खांद्याच्या दुखापतीतून बाहेर येण्यासाठी त्याला किमान सहा आठवड्यांचा कालावधी लागणार आहे. जर शस्त्रक्रिया करावी लागली तर जास्त कालावधी लागेल. त्याला नेट्समध्ये परत येण्यास किमान चार महिने लागण्याची शक्यता आहे. आयपीएलचा १४वा हंगाम ९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. श्रेयस दिल्ली कॅपिटल्स संघाचा कर्णधार आहे. श्रेयसच्या गैरहजेरीत दिल्लीचे नेतृत्व ऋषभ पंत, स्टीव्ह स्मिथ अथवा आर अश्विनकडे सोपवले जाऊ शकते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago