RCB team captain needs to be changed - Sanjay Manjrekar
विराट कोहलीच्या RCB संघाचं आयपीएलच्या तेराव्या हंगामातलं आव्हान संपुष्टात आलं आहे. संघाच्या पराभवानंतर विराट कोहलीने RCB च्या कर्णधारपदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी होत आहे. यातच आता संजय मांजरेकर यांनी एक पाऊल पुढे जात RCB च्या टीम मॅनेजमेंटला विराट कोहलीबद्दल निर्णय घ्यावा लागेल असं म्हटलं आहे.
“आता ही गोष्ट कर्णधारावर अजिबात अवलंबून राहिलेली नाही. याबद्दल टीम मॅनेजमेंट आणि मालकांनी निर्णय घ्यायला हवा. कारण नेतृत्व कोण करेल आणि संघाला कशाप्रकारच्या कर्णधाराची गरज आहे हे निर्णय मॅनेजमेंट आणि मालक घेत असतात. जर तुम्हाला परिस्थितीत बदल झालेला पहायचा असेल आणि चांगले निकाल हवे असतील तर कर्णधार बदलणं गरजेचं आहे. विराट कोहलीने स्वतः मी चांगली कामगिरी केली नाहीये, हे सांगणं मला अपेक्षित नाही. इकडे संघाच्या मालकांनी हा निर्णय घेतला पाहिजे. जर RCB चा संघ आतापर्यंत एकही विजेतेपद जिंकू शकलेला नाही तर मी यासाठी संघ मालकांना जास्त दोषी धरेन कारण त्यांनी संघाला योग्य नेतृत्व दिलं नाही.” असं मत संजय मांजरेकर यांनी व्यक्त केलं आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…