IPL 2020 MI vs DC Mumbai Indians won by 5 wickets
दुबई : मुंबई इंडियन्सने यावर्षीच्या आयपीएलच्या जेतेपदाला देखील गवसणी घातली आहे. या अंतिम सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने मुंबईच्या संघापुढे १५७ धावांचे आव्हान ठेवले होते. पण रोहितच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर मुंबईने हे आव्हान सहजरित्या पेलले आणि जेतेपद पटकावले. मुंबईचे हे पाचवे जेतेपद ठरले, आतापर्यंत आयीएलमध्ये एकाही संघाला पाचवेळा जेतेपद पटकावता आले नाही. मुंबईच्या संघाने पाच विकेट्स राखत सहज जेतेपद मिळवले.
दिल्लीच्या १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सने पहिल्या षटकातच षटकारासह झोकात सुरुवात केली. रोहितने पहिल्याच षटकात षटकार लगावला. त्यानंतर दुसऱ्याच षटकात मुंबईने १८ धावा करत आपले इरादे स्पष्ट केले. मुंबईने पहिल्या चार षटकांमध्ये जवळपास १०च्या धावगतीने धावा केल्या. पण चौथ्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मुंबईला पहिला धक्का बसला. मार्कस स्टॉइनिसने आपल्या पहिल्याच चेंडूवर मुंबईच्या क्विंटन डीकॉकला बाद केले. डीकॉकने १२ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर २० धावा केल्या.
मुंबईला पहिला धक्का बसल्यावर रोहित आणि सूर्यकुमार यादव यांची चांगली पार्टनरशिप जमली होती. पण रोहितच्या चुकीमुळे यादवला बाद व्हावे लागले. रोहित चेंडू मारत थेट धाव घेण्यासाठी धावत सुटला. त्याने यादवकडे पाहिले नाही. रोहितने अर्धी खेळपट्टी ओलांडली, पण यादव आपल्या जागेवरच थांबलेला होता. या गोष्टीचा फायदा दिल्लीच्या प्रवीण दुबेने घेतला आणि थेट चेंडू यष्टीरक्षक रिषभ पंतकडे दिला. रिषभने यावेळी सहजपणे यादवला धावचीत केले. यादव बाद होण्याचा धक्का मुंबईला बसला. पण रोहितने दुसऱ्या बाजूने जोरदार फटकेबाजी करत आपले अर्धशतकही पूर्ण केले.
श्रेयस अय्यर आणि रिषभ पंत यांच्या धडाकेबाज अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सच्या संघाला मुंबई इंडियन्सपुढे १५७ धावांचे आव्हान ठेवता आले होते. आयपीएलच्या आजच्या अंतिम फेरीत दिल्लीची ३ बाद २२ अशी अवस्था झाली होती. पण त्यानंतर अय्यर आणि पंत या दोघांनी धडाकेबाज खेळी करत मुंबईच्या गोलंदाजीवरच जोरदार हल्ला चढवला. अय्यर आणि पंत या दोघांनी अर्धशतके पूर्ण केली. या दोघांच्या दमदार फटकेबाजीमुळेच दिल्लीला मुंबईपुढे हे सन्मानजनक आव्हान ठेवता आले. श्रेयस अय्यरने यावेळी नाबाद ६५ धावांची धडाकेबाज खेळी केली.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…