Mumbai Indians win
IPL २०२१ : मुंबई इंडियन्सने कोलकातावर 10 धावांनी मात करत मोसमातील पहिला विजय साजरा केला. 153 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या कोलकाताच्या संघाला आव्हान पूर्ण करता आले नाही. त्यामुळे एकवेळ त्यांच्या हाताशी आलेला विजय हातातून निसटला. त्यांना केवळ 142 धावांपर्यंत मजल मारता आली.
मुंबईकडून क्विंटन डि कॉक आणि रोहित शर्मा यांनी डावाची सुरुवात केली. मात्र, डि कॉकला वरुण चक्रवर्तीने अवघ्या दोन धावांवर तंबूत धाडले. त्यानंतर सूर्यकुमार यादवने हरभजनच्या एका षटकात तीन चौकार लगावले. मुंबईने पहिल्या पॉवरप्लेमध्ये 1 बाद 42 धावा केल्या. त्याने रोहितसोबत 33 चेंडूत अर्धशतकी भागीदारी रचली. फिरकीपटू शाकिब अल हसनने सूर्यकुमारला बाद करत ही भागीदारी मोडली. सूर्यकुमारने 7 चौकार आणि 2 षटकारांसह 56 धावांची खेळी केली. संयमी खेळी करणारा रोहितही 43 धावांवर बाद झाला. कमिन्सने त्याला बोल्ड केले. ईशान किशन, हार्दिक पंड्या मोठे फटके खेळण्याच्या नादात बाद झाले. अष्टपलू खेळाडू आंद्रे रसेलने कायरन पोलार्ड, मार्को जानसेन, कृणाल पंड्या, जसप्रीत बुमराह आणि राहुल चहर यांना बाद करत मुंबईच्या डावाला खिंडार पाडले. पॅट कमिन्सने 2 बळी घेतले.
मुंबईच्या 153 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताचे सलामीवीर शुबमन गिल आणि नितीश राणा यांनी 72 धावांची सलामी भागीदारी रचली. त्यानंतर राहुल चहरने गिलला (३३ धावा) माघारी धाडत मुंबईला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर चहरने ईऑन मॉर्गन (7), राहुल त्रिपाठी (5) यांनाही बाद केले. नितीश राणाने सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले. मात्र, चहरने त्यालाही बाद केले. राणाने 6 चौकार आणि 2 षटकारांसह 57 धावा केल्या. राणा बाद झाल्यानंतर अपेक्षित धावा आणि चेंडू यांचे अंतर वाढतच गेले. शेवटच्या दोन षटकात बुमराह आणि बोल्टने अप्रतिम गोलंदाजी केली. शेवटच्या षटकात 15 धावांची गरज असताना बोल्टने रसेल आणि कमिन्स यांना बाद केले आणि मुंबईने यंदाच्या हंगामात पहिला विजय मिळवला.
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…