Today match between Mumbai Indians and Sunrisers Hyderabad
आयपीएलचा 56 वा सामना मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात आज सायंकाळी ७.३० वाजता शारजामध्ये रंगणार आहे. मुंबईने यापूर्वीच प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. हैदराबादचा नेट रनरेट मुंबईनंतर सर्वोत्तम आहे. अशा परिस्थितीत टॉप-4 मध्ये आपले स्थान निश्चित करण्यासाठी हैदराबादला हा सामना जिंकणे आवश्यक आहे. जर हैदराबादने हा सामना गमावला तर लीगमधील त्यांचा प्रवास येथेच संपेल आणि कोलकाता नाईट रायडर्स प्ले-ऑफमध्ये प्रवेश करेल.
मागील वेळी मुंबईने हैदराबादला 34 धावांनी पराभूत केले होते. शारजामध्येच खेळल्या गेलेल्या मोसमातील 17 व्या सामन्यात मुंबईने प्रथम फलंदाजी करत 5 विकेट्सवर 208 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल हैदराबादला 7 विकेट्सवर 174 धावा करता आल्या.
शारजाहमधील खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकते. येथे स्लो विकेटमुळे स्पिनर्सनाही खूप मदत होईल. शारजामध्ये नाणेफेक जिंकणार्या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल.
आयपीएलमध्ये मुंबईने आतापर्यंत 200 सामने खेळले आहेत. त्यात 118 सामन्यांत विजय मिळविला आहे, तर 82 मध्ये पराभूत झाला आहे. लीगमध्ये मुंबईचा सक्सेस रेट 59.00% आहे. लीगमध्ये हैदराबादने आतापर्यंत 121 सामने खेळले आहेत. 64 सामन्यांत संघ जिंकला आहे, तर 57 मध्ये पराभूत झाला आहे. हैदराबादचा सक्सेस रेट 53.30% आहे.
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…