क्रीडा

IPL 2020 : आज मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात रंगणार फायनल मैच

आयपीएल २०२० चा अंतिम सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात आज सायंकाळी ७.30 वाजता खेळला जाईल. दिल्ली कॅपिटल्स आज आयपीएलमध्ये आपली पहिली फायनल मॅच खेळेल. दिल्ली समोर गतविजेत्या मुंबई इंडियन्सचे आव्हान आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई सहाव्या वेळी अंतिम सामना खेळेल. मुंबईने 4 वेळा (2013, 2015, 2017, 2019) विजेतेपद मिळवले आहे.

दिल्ली कॅपिटल्स त्यांचे पहिले जेतेपद मिळवण्यासाठी इच्छूक आहे. शिखर धवन ह्या हंगामात 500+ धावा बनवणाऱ्या तीन फलंदाजांपैकी एक आहे. धवनने चेन्नई आणि पंजाबविरुद्ध सलग दोन (१०१, १०6) नाबाद शतके लगावली होती. मात्र ह्या हंगामात दिल्लीची ताकद गोलंदाजी राहिली.

मुंबईच्या प्लेइंग -११ मध्ये ७ क्रमांकापर्यंत उत्तम फलंदाजी करू शकतात. रोहित शर्मा, क्विंटन डिकॉक आणि सूर्यकुमार यादव यासारखे फलंदाज आहेत. अष्टपैलू खेळाडूमध्ये हार्दिक आणि क्रुणाल पांड्या तसेच केरॉन पोलार्डही आहेत. आज अष्टपैलू खेळाडू जयंत यादव मुंबईच्या संघात दीपक चहरच्या जागी येऊ शकतो. असे झाल्यास मुंबईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये आठवा फलंदाज आणि उत्कृष्ट राइट-आर्म ऑफ स्पिनर संघाला लाभेल.

या मोसमातील टॉप-३ गोलंदाजांमध्ये मुंबईचे २ आणि दिल्लीचा एक गोलंदाज आहेत. लिस्ट मध्ये दिल्लीच्या कागिसो रबाडाने 29 विकेट्ससह प्रथम क्रमांकावर स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर मुंबईचा जसप्रीत बुमराह 27 विकेट घेऊन दुसर्‍या स्थानावर आणि ट्रेंट बोल्ट 22 विकेटसह तिसर्‍या स्थानावर आहे.

आयपीएलमध्ये मुंबईने आतापर्यंत दिल्लीविरुद्ध 27 सामने खेळले आहेत. त्यातील 15 सामन्यांत जिंकले तर १२ सामन्यांत पराभूत झाले आहेत. या हंगामात आतापर्यंत दोघांमध्ये 3 सामने खेळले गेले आहेत. तिन्ही सामन्यांत मुंबईने दिल्लीचा पराभव केला. याआधी क्वालिफायर -२ मध्ये दोन्ही संघांमध्ये सामना खेळला गेला, त्यात मुंबईने 57 धावांनी विजय मिळवला होता.

दुबईतील खेळपट्टी फलंदाजांना मदत करू शकेल. येथे स्लो विकेट असल्याने स्पिनर्सनाही खूप मदत होईल. नाणेफेक जिंकणार्‍या संघाला प्रथम फलंदाजी करायला आवडेल.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 दिवस ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 आठवडा ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 आठवडे ago

शेतकऱ्यांना भूसंपादनाचे पैसे तातडीने द्यावे – मंत्री संजय राठोड

मुंबई : जलसंधारण महामंडळ आणि शासन अंतर्गत प्रकल्पांच्या बाधित शेतकऱ्यांना भूसंपादनाचे पैसे तातडीने देण्याच्या सूचना…

2 आठवडे ago

कामगारांना सक्तीची सेवानिवृत्ती देणाऱ्या कंपनी व्यवस्थापनावर कारवाई करा, कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश

मुंबई : नाशिक येथील बजाज इलेक्ट्रिक कंपनीतील ४१ कायमस्वरूपी कामगारांना व्यवस्थापनाने कोणतीही पूर्वकल्पना न देता…

2 आठवडे ago

बालगृहातील ७१५ बालके दहावीत उत्तीर्ण; मंत्री आदिती तटकरे यांच्याकडून अभिनंदन !

मुंबई : प्रतिकूल परि‍स्थितीवर मात करत बालगृहातील ७१५ विद्यार्थ्यांनी दहावीत यश संपादन करत सकारात्मक जीवनाचा…

2 आठवडे ago