IPL 2020: Delhi Capitals beat Rajasthan Royals by 13 runs
दिल्ली कॅपिटल्सने राजस्थान रॉयल्सवर १३ धावांनी मात केली आहे. १६२ धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेला राजस्थानचा संघ १४८ धावांपर्यंत मजल मारु शकला.
नाणेफेक जिंकत दिल्लीचा कर्णधार श्रेयस अय्यरने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दिल्लीच्या डावाची सुरुवात खराब झाली. पहिल्याच चेंडूवर पृथ्वी शॉला जोफ्रा आर्चरने क्लीन बोल्ड केले. त्यानंतर अजिंक्य रहाणेने आर्चरच्या गोलंदाजीवर आपली विकेट गमावली, तो २ धावा काढत बाद झाला. यानंतर कर्णधार श्रेयस अय्यर आणि सलामीवीर शिखर धवन यांनी तिसऱ्या विकेटसाठी ८५ धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला.
शिखरने ३३ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ५७ धावा केल्यानंतर श्रेयस गोपाळच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नात बाद झाला. श्रेयस अय्यरही अर्धशतक झळकावत कार्तिक त्यागीच्या गोलंदाजीवर आर्चरकडे झेल देत माघारी परतला. त्याने ५३ धावांची खेळी केली. यानंतर अखेरच्या फळीतल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत दिल्लीला मोठी धावसंख्या गाठून देण्याचा प्रयत्न केला. राजस्थानकडून जोफ्रा आर्चरने ३, जयदेव उनाडकटने २ तर कार्तिक त्यागी आणि श्रेयस गोपाळने प्रत्येकी १-१ बळी घेतला. दिल्ली कॅपिटल्सने सामन्यात १६१ धावा केल्या.
१६२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना राजस्थानच्या सलामीवीर बेन स्टोक्स आणि जोस बटलर यांनी पहिल्या विकेटसाठी ३७ धावांची भागीदारी केली. त्यानंतर नॉर्जने जोस बटलरचा त्रिफळा उडवत दिल्लीला पहिलं यश मिळवून दिलं. कर्णधार स्टिव्ह स्मिथही रविचंद्रन आश्विनच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्यानंतर बेन स्टोक्स आणि संजू सॅमसन या दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या विकेटसाठी ४६ धावांची भागीदारी करत संघाचं आव्हान कायम राखलं. बेन स्टोक्सने दिल्लीच्या गोलंदाजीवर हल्लाबोल करत ३५ चेंडूत ६ चौकारांसह ४१ धावा केल्या. तुषार देशपांडेने बेन स्टोक्सला बाद करत दिल्लीला महत्वाची विकेट मिळवून दिली. स्टोक्सने ४१ धावा केल्या. यानंतर संजू सॅमसनही अक्षर पटेलच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला.
रियान परागही रॉबिन उथप्पासोबत एकेरी धाव घेताना झालेल्या गोंधळात धावबाद होऊन माघारी परतला. मधल्या फळीत रॉबिन उथप्पा आणि राहुल तेवतिया यांनी फटकेबाजी करत सामन्यात रंगत निर्माण केली. परंतू नॉर्जने उथप्पाचा त्रिफळा उडवत दिल्लीला पुन्हा एक यश मिळवून दिलं. १९ व्या षटकात जोफ्रा आर्चरही फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात अजिंक्य रहाणेकडे झेल देऊन बाद झाला, रबाडाने त्याचा बळी घेतला. दिल्लीकडून अॅन्रित नॉर्ज आणि तुषार देशपांडेने २ तर कगिसो रबाडा, आश्विन आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…