क्रीडा

सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वात भारताने जिंकली पहिली रोड सेफ्टी वर्ल्ड सीरिज

रायपूर : रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजच्या अंतिम सामन्यात इंडिया लेजेंड्स ने श्रीलंका लेजेंड्सचा १४ धावांनी पराभव केला. सचिन तेंडुलकरच्या नेतृत्वाखाली भारताने पहिल्या रोड सेफ्टी वर्ल्ड सीरीजचे विजेतेपद मिळवले. भारताने प्रथम फलंदाजी करत १८१ धावा केल्या होत्या. या धावसंख्येचा पाठलाग करताना श्रीलंकेला १६७ धावा करता आल्या.

अंतिम सामन्यात श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताच्या डावाची सुरूवात विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकर यांनी केली. सेहवाग १० धावा करून बॅड झाला. त्यानंतर सनथ जयसूर्याने बद्रीनाथची विकेट घेत भारताला दुसरा धक्का दिला. भारताची २ बाद ३५ अशी अवस्था झाली. त्यानंतर सचिन ३० धावा करुन माघारी परतला. नंतर युसूफ पठाणने युवराज सिंगसह श्रीलंकेच्या गोलंदाजांची धुलाई केली. युवराजने ३५ चेंडूत ३ षटकार आणि ४ चौकारांसह ५० धावा केल्या. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ९५ धावांची भागिदारी केली. त्यानंतर युवराज ६० धावांवर बाद झाला. युसूफ पठाणने ६२ धावा केल्या. तर इरफानने ३ चेंडूत ८ धावा केल्या.

विजयासाठी १८२ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेने चांगली सुरूवात केली. तिलकरत्ने आणि जयसूर्या यांनी पहिल्या विकेटसाठी ६२ धावांची भागिदारी केली. युसूफने तिलकरत्नेला २१ धावांवर बाद केले. त्यानंतर दिलशान 21 धावांवर बाद झाला आणि त्यानंतर चमारा सिल्वा अवघ्या दोन धावांवर पॅव्हेलियनमध्ये परतला. त्यानंतर इरफानने जयसूर्यला ४३ धावांवर बाद केले. उपुल थरंगाने संघासाठी 13 धावांचे योगदान दिले. जयसिंगाने 39 धावा केल्या तर नुवान कुलशेखरा एक धाव घेऊन नाबाद राहिला. भारतीय गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी करत भारताला १४ धावांनी विजय मिळवून दिला. युसूफ पठाण आणि इरफान पठाण यांनी प्रत्येकी २ विकेट तर गोनी आणि पटेल यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

3 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

3 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

3 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

3 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

1 महिना ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

1 महिना ago