RCB team captain needs to be changed - Sanjay Manjrekar
शारजाह : आयपीएलच्या कालच्या एलिमिनेटर सामन्यात कोलकाताविरुद्ध आरसीबीचा पराभव झाला. त्यामुळे विराट कोहली चांगलाच भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
विराट म्हणाला की, “आतापर्यंत मी माझे सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न केला. गेल्या तीन वर्षांमध्ये संघाची चांगली बांधणी झाली होती. पण आता यापुढे मी आरसीबीचा कर्णधार राहणार नाही. पण अखेरच्या दिवसापर्यंत मी आरसीबीबरोबर असलेली कमिटमेंट कायम ठेवणार आहे. मी आरसीबीचा कर्णधार नसलो तरी संघाबरोबर एक खेळाडू म्हणून नक्कीच कायम असेन.”
आतापर्यंतचा कोलकाताच्या संघाचा युएईमधला रेकॉर्ड आहे की त्यांनी इथे धावांचा पाठलाग करताना एकही सामना गमावलेला नाही. मात्र, केकेआरविरुद्धच्या या महत्वाच्या सामन्यात कोहलीने नाणेफेक जिंकली आणि त्याने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे हा निर्णय चुकल्याचे पाहायला मिळाले.
विराटने सामन्यादम्यान पंचांशी हुज्जत घातली
आरसीबीविरुद्धच्या या सामन्यात कोलकाताचा राहुल त्रिपाठी याच्या पॅडला चेंडू लागला. त्यावेळी आरसीबीच्या संघाने जोरदार अपील केले. पण मैदानातील पंचांनी राहुलला नाबाद ठरवले. त्यानंतर कोहलीने डीआरएस घेतला. यावेळी तिसऱ्या पंचांनी राहुलला बादही दिले. पण तरीही कोहली मैदानातील पंचांकडे गेला आणि त्यांच्याशी हुज्जत घालायला लागला. चुक सुधारल्यावरही पंचांशी हुज्जत घालणे, याचे समर्थन कोणीही करू शकत नाही.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…