राजकारण

जेव्हा भारत कोणाशी मैत्रीचा हात पुढे करतो तेव्हा तो तिसऱ्या देशाविरोधात नसतो – पंतप्रधान

दिल्ली : जेव्हा भारत कोणाशी मैत्रीचा हात पुढे करतो तेव्हा तो तिसऱ्या देशाविरोधात नसतो, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत केले. भारतानं कायमचं विश्वकल्याणाला प्राधान्य दिलं असल्याचंही त्यांनी यावेळी जगाला सांगितंल.

मोदी म्हणाले, “भारतानं जर कोणाला मैत्रीचा हात दिला तर त्याचा अर्थ तो कधीच तिसऱ्या देशाच्या विरोधात आहे असा होत नाही. भारत जेव्हा विकासाचं सहकार्य कायम ठेवतो त्यावेळी त्याच्यामागे कोणत्यातरी सहकारी देशाला बळजबरी करण्याचा विचार नसतो. आम्ही आमच्या विकासाच्या प्रवासात मिळालेला अनुभव शेअर करायलाही मागेपुढे पाहत नाही भारतानं कायम विश्वकल्याणाला प्राधान्य दिलं आहे. भारत एक असा देश आहे ज्याने आपले ५० शूर जवान जगातील विविध शांतता मोहिमेवर पाठवले आहेत. भारताने कायम संपूर्ण मानव जातीच्या हिताचा विचार केला आहे. भारतानं आपला स्वार्थ पाहिला नाही, भारताची धोरणं कायम याने प्रेरित राहिली आहेत. महामारीच्या या कठीण काळातही भारताची फार्मा इंडस्ट्रीने १५० पेक्षा अधिक देशांना गरजेची औषध पाठवली आहेत”, असंही मोदी यावेळी म्हणाले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago