सुशांत सिंह राजपूत प्रकरणात बिहार पोलिसांचा तपास सुरू आहे. या प्रकरणी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
शनिवारी संध्याकाळी बिहारचे उपमुख्यमंत्री सुशील मोदी यांनी ट्वीट केले की,
उद्धव ठाकरे यांच्यावर कॉंग्रेस आणि बॉलिवूड माफियांचा दबाव आहे. त्यामुळे सुशांतच्या प्रकरणातील जबाबदार असलेल्या सर्व घटकांना वाचवण्यावर कल दिला जात आहेत. असं करुन काँग्रेस बिहारमधील लोकांना काय तोंड दाखवणार? आता बिहारचा मुलगा सुशांतसिंग राजपूतच्या मृत्यूच्या चौकशीसाठी आलेल्या बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांचंही सहकार्य मिळत नाही. बिहार सरकारने केवळ चौकशीचे आदेश दिले नाहीत तर रिया चक्रवर्ती यांच्या याचिकेवर सुनावणी करताना बिहारची बाजू ऐकली जावी, अशी विनंती करून सर्वोच्च न्यायालयात कॅविएट दाखल केली. बिहार सरकार सुशांतला न्याय देण्यासाठी कोणत्याही थराला जाईल. नवोदित अभिनेता सुशांतसिंग राजपूतच्या आत्महत्येमुळे कोट्यावधी बिहारी लोकांना धक्का बसला आहे. त्यामुळे जवळपास सर्वच पक्षांना या प्रकरणाची सीबीआय चौकशी हवी आहे. पूर्वी महाराष्ट्रात बिहारमधील लोकांना गैरवर्तन केल्याच्या तक्रारी येत असत, पण आता कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या कुरघोडीवर आधारित उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मर्यादा ओलांडल्या आहेत.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…