This is a statement that hurts the image of Modiji - Sanjay Raut
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रावरून केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी नाराजी व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी, राज्यपाल पत्राबाबत अमित शहांची भूमिका योग्यच आहे. ते सत्य भूमिका मांडतात, असे म्हटलं आहे.
महाराष्ट्रात मंदिरे उघडण्याच्या मुद्यावरून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले होते. त्या पत्रातून ‘तुम्ही कधीपासून सेक्युलर झालात’, असा सवाल त्यांनी मुख्यमंत्र्यांना केला होता. यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी नाराजी व्यक्त करताना राज्यपालांनी ‘ते शब्द टाळायला पाहिजे होते’, असे म्हटले आहे. शहा यांच्या या भूमिकेचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वागत केले आहे. राज्यपाल पत्राबाबत अमित शहांची भूमिका योग्यच आहे, आम्ही या वादावर आता पडदा टाकला आहे. अमित शहांचे वक्तव्य राजकीय अर्थाने नाही आहे. मी त्यांना ओळखतो ते सत्य भूमिका मांडतात, असं संजय राऊत म्हणाले.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…