woman tied to chain in allegation of infidelity
राजस्थान : राजस्थानमधील प्रतापगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिला मागील 3 महिन्यांपासून 30 किलो वजनाच्या साखळीने बांधून ठेवले होते. याबद्दल माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा त्यांना लोखंडी साखळ्यांनी बांधलेली ही महिला आढळली. त्यानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी या महिलेला लोखंडी साखळीतून मुक्त केले.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भैरूलाल याला आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय होता. त्यामुळे त्याने जवळपास तीन महिन्यांपासून आपल्या पत्नीला 30 किलो वजनाच्या लोखंडी साखळीने बांधले होते. भैरूलाल तिला मानसिक त्रास देत होता. जेव्हा पोलिसांना याबद्दल माहिती मिळाली, तेव्हा ते पोलीस दलासह भैरूलालच्या घरी पोहोचले. त्यावेळी त्यांना ही महिला दिसली, तिला लोखंडी साखळीने बांधून ठेवले होते. पोलिसांनी महिलेला नाव विचारले असता तिने तिचे नाव जीवाबाई असल्याचे सांगितले.
पोलिसांनी महिलेला विचारले की तिला अशा प्रकारे बांधून का ठेवले आहे? तेव्हा तिने सांगितले कि, “माझे माहेर हिंगलाटमध्ये आहे. तिथे माझी आई सीताबाई राहते. माझं लग्न भैरूलाल मीणाबरोबर झालं. मी माझ्या आईची सेवा करण्यासाठी आणि शेतीचे काम करण्यासाठी मधून-मधून हिंगलाटमध्ये जायचे. मात्र, माझा नवरा मला तिथे येऊन मारहाण करायचा.
पीडित महिलेने पुढे सांगितले की माझा नवरा दारू पिऊन यायचा आणि माझ्यावर संशय घ्यायचा. त्याला वाटायचे की माझे कोणाशी तरी अवैध संबंध आहेत, त्यामुळे तो माझ्यावर अत्याचार करायचा. पण, होळीनंतर दोन-तीन दिवसांनी पती भैरुलाल, या महिलेचा मुलगा राजू आणि तिच्या कुटुंबातील इतर सदस्यांनी तिला लोखंडी साखळीने बांधून ठेवले. तेव्हापासून ती याच अवस्थेत राहत होती.
सुमारे तीन महिन्यांपासून लोखंडी साखळीने बांधून ठेवल्यामुळे या महिलेला प्रचंड शारीरिक आणि मानसिक त्रास झाला आहे. या महिलेचा नवरा दररोज तिला मारहाण करायचा. तो लोखंडी साखळीला कुलूप लावून चावी आपल्याबरोबर घेऊन जायचा. लोखंडी साखळीने बांधल्यामुळे महिलेच्या डाव्या पायाला सूज आली आहे. पीडित महिलेने तिला त्रास देणाऱ्या कुटुंबातील सदस्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…