Woman Committed Suicide With Her 5 Daughters
छत्तीसगड : महासमुंद येथे बुधवारी रात्री उशिरा एका महिलेने तिच्या 5 मुलींसह रेल्वेसमोर उडी मारून आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी रेल्वे रुळावर 50 मीटर अंतरावर सर्व मृतदेह विखुरलेले आढळले. मरण पावलेली सर्व मुली 10 ते 18 वर्षे वयोगटातील आहेत. मद्यधुंद पतीबरोबर वाद झाल्यानंतर या महिलेने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, इमलीभांठा कालव्याच्या पुलाजवळ गुरुवारी सकाळी रेल्वेच्या रुळावर लोकांनी मृतदेह विखुरलेले बघितले. त्यांनी तात्काळ कोतवाली पोलिस ठाण्यात याची माहिती दिली. यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. रेल्वेलाही याबाबत माहिती देण्यात आली असून गाड्यांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.
भयंकर! भाजप नेत्याच्या मुलीवर सामुहिक बलात्कार, मुलीला मारहाण करून तिचा डोळा काढला आणि…
बेमचा येथे राहणारी महिला उमा साहू (वय 45) हिचा पती केजराम याला दारूचे व्यसन होते. बुधवारी संध्याकाळी तो दारू पिऊन घरी पोहोचला, तेव्हा पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाला. त्यानंतर त्यांच्यातले भांडण इतके वाढले की संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही महिला आपल्या पाच मुली अन्नपूर्णा (18), यशोदा (16), भूमिका (14), कुमकुम (12) आणि तुलसी (10) यांना सोबत घेऊन घराबाहेर पडली. त्यानंतर रात्री 9 ते 9.30 च्या दरम्यान या महिलेने तिच्या सर्व मुलींसह लिंक एक्स्प्रेससमोर उडी मारून आत्महत्या केली.
पोलिसांच्या म्हणण्यानुसार, ही घटना रात्री उशिरा घडली असावी. त्या महिलेचे आणि तीन मुलींचे मृतदेह थोड्या अंतरावर सापडले, तर इतर दोन मुलींचे मृतदेह ट्रॅकवर पडलेले आढळले. मृतदेहांबरोबरच त्यांच्या चप्पलही दूरवर पसरलेल्या होत्या. पोलिसांनी सांगितले की आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली, त्यानंतर या महिलेची आणि तिच्या मुलींची ओळख पटली.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…