नवी दिल्ली : केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री रविशंकर प्रसाद यांचे अकाउंट ट्वीटरने आज ब्लॉक केले होते. जवळपास एक तास त्यांचे अकाउंट ब्लॉक होते. ट्वीटरने याबाबत सांगितले की प्रसाद यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चेची क्लिक पोस्ट केल्याने ट्वीटरकडे तक्रार आली. यानंतर अमेरिकेतील डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांचे अकाउंट बंद करण्यात आले. याबाबत रविशंकर प्रसाद यांनी संताप व्यक्त केला आहे.
रविशंकर प्रसाद यांचे अकाउंट पुन्हा सुरू झाल्यानंतर त्यांनी ट्वीट करून संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले कि, “मित्रांनो आज एक विचित्र घटना घडली. ट्वीटरने जवळपास एक तास माझं अकाउंट बंद केलं होतं. मला अकाउंटचा उपयोग करता येत नव्हता. अमेरिकेतील डिजिटल मिलेनियम कॉपीराइट ऍक्टचं उल्लंघन केल्याचं कारण ट्वीटरने दिले. पण नंतर ट्वीटरने माझं अकाउंट पुन्हा सुरू केलं. ट्वीटरने कोणतीही पूर्वकल्पना न देता माझे अकाउंट ब्लॉक केले, हे एकप्रकारे नवीन नियमांचे उल्लंघन आहे.”
प्रसाद पुढे म्हणाले कि, “खास करून वृत्तवाहिन्यांवर दिलेल्या मुलाखतींच्या क्लिप्स आणि त्यांच्या प्रभावामुळे ट्वीटरचे पंख कुरतडे गेले आहेत. ट्वीटरला आयटी नियमांचे पालन का करायचे नाही? हे आता यावरून स्पष्ट झाले आहे. नियमांचं पालन केल्यास कंपनीला कोणाच्याही अकाउंटमध्ये मनमानी पद्धतीने दखल देता येणार नाही आणि अजेंड्यानुसार काम करणं ट्वीटरला अवघड होईल. हे यामागचं कारण आहे.”
केंद्र सरकारने सोशल मीडियासाठी नियमावली जारी केली आहे. गेल्या काही दिवसांपासून केंद्र सरकार आणि ट्वीटरमध्ये वाद सुरू आहे. हा वाद सुरू असताना आता ट्वीटरने केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्र्यांचेच अकाउंट काही काळासाठी बंद केल्याने हा वाद आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अमरावती, दि. 18 (जिमाका) : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत…
अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…
मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…
सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…