देश

लग्नाला चालेल्या वऱ्हाडाची बस दरीत कोसळली, २५ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

डेहराडून : उत्तराखंडमध्ये भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. पौडी गढवाल जिल्ह्यातील सिमडी गावामध्ये 45 ते 50 लोकांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळली आहे. या भीषण अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पौडी गढवाल जिल्ह्यातील सिमडी गावाजवळ असलेल्या रिखनीखाल-बिरोखल महामार्गावर ही घटना घडली आहे. लग्नाचे वऱ्हाड घेऊन ही बस लालढांगहून काडा तल्ला इथं जात होती. बिरोखाल येथील सीमडी बँडजवळ बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस खोल दरीत कोसळली. या बसमध्ये 40 ते 50 वऱ्हाडी सामील होते. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. रात्रभर बचावकार्य सुरू होतं.

या अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हे आपात्कालीन विभागाच्या केंद्रावर पोहोचले. घटनास्थळी SDRF ची पाठवण्यात आली. सर्व जखमी प्रवाशांना बाहेर काढले जात आहे. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पुष्कर सिंह धामी यांनी दिली.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago