देश

विजेचा धक्का लागून एकाच कुटुंबातील सहा जणांचा दुर्दैवी अंत, दोन जण गंभीर

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील छतरपूरमध्ये एकाच कुटुंबातील सहा जणांचा विजेचा धक्का लागल्यामुळे मृत्यू झाला आहे. या कुटुंबातील एक तरुण पाणी काढण्यासाठी पाण्याच्या टाकीमध्ये उतरला होता, त्यावेळी त्याला करंट बसल्याचे घरातील लोकांनी पाहिले. मात्र, ऐनवेळी मागचा-पुढचा विचार न करता त्यांनी त्याला वाचवण्यासाठी धाव घेतली. तरुणाला वाचविण्याच्या प्रयत्नात या तरूणासह कुटुंबातील सहा सदस्यांचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी अंत झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महुआ-झाला येथील रहिवासी लक्ष्मण अहिरवार यांच्या घरात ही घटना घडली आहे. त्यांच्या घरात असलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये अंधार पडत असल्यामुळे त्यांनी टाकीमध्ये उजेड पडण्यासाठी लाईट लावून प्रकाशाची व्यवस्था केली होती. जेणेकरून टाकीतून पाणी काढताना कोणतीही अडचण येणार नाही. मात्र, आज सकाळी आठ वाजता कुटुंबातील एक तरुण पाणी काढण्यासाठी टाकीमध्ये उतरला होता, तेव्हा त्याला तीव्र करंट बसला. कुटुंबातील सदस्यांनी त्याला अशा अवस्थेत बघितल्यामुळे घाबरून त्यांनी त्या युवकाला पकडून खेचण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे बाकीच्या सदस्यांना देखील विजेचा धक्का बसला. यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला.

या घटनेत लक्ष्मण रमुआ अहिरवार (वय 55), रामप्रसाद हल्ली अहिरवार (वय 30), शंकर हल्ली अहिरवार (वय 35), मिलन अहिरवार (वय 25), नरेंद्र जगन अहिरवार (वय २०), विजय जगन अहिरवार (वय 20) यांचा मृत्यू झाला. तर कुटुंबातील दोन जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविले. एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाल्यामुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान, जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

3 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

3 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

3 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

3 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

1 महिना ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

1 महिना ago