देश

गंगा नदीत मालवाहू जहाजाचे संतुलन बिघडल्याने अपघात, ५ ट्रकसह अनेक जण बुडाले

झारखंडमधील साहिबगंज आणि बिहारमधील कटिहार जिल्ह्यातील मनिहारी घाट दरम्यान गंगा नदीत मालवाहू जहाजाचा बॅलन्स गेल्याने अपघात घडला आहे. या जहाजावर दगड भरलेले सुमारे 14 ट्रक होते. यासोबतच सर्व ट्रकचे चालक आणि मदतनीसही या जहाजावर होते. या अपघातात जहाजाच्या कॅप्टन टीमसह ट्रकचे चालक-मदतनीस अशा सुमारे 10 जणांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. आतापर्यंत हे सर्वजण बेपत्ता असल्याचे सांगण्यात येत आहे. माहिती मिळाल्यानंतर साहिबगंज प्रशासन मदत आणि बचाव कार्यात गुंतले आहे. हे जहाज साहिबगंजहून मनिहारीकडे जात होते.

मिळालेल्या माहितीनुसार, जहाजावर एकूण 14 ट्रक होते. त्यापैकी एका ट्रकचा टायर फुटला. त्यामुळे ती ट्रक अनियंत्रित होऊन नदीत पडली, यासह आणखी 4 ट्रक खाली पडले. उरलेल्या ट्रकसह जहाज किनाऱ्यावर पोहोचले. परंतु, 9 ट्रक जहाजावरच उलटले आहेत, तर 5 ट्रक गंगा नदीत बुडाले आहेत. 10 जण बेपत्ता आहेत. बुडालेल्या ट्रकचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफच्या टीमला पाचारण करण्यात आले आहे. पथक आल्यानंतरच बुडालेले ट्रक आणि लोक शोधण्याची प्रक्रिया सुरू होईल.

हे जहाज काल दुपारी रवाना झाले होते. नदीच्या आत काही अंतर गेल्यावर त्यात बिघाड झाला. जहाजावरील लोकांनी ते दुरुस्त केले. मात्र, यानंतर संतुलन बिघडल्याने 5 ट्रक नदीत पडले. समदा घाट ते मनिहारी दरम्यान हा अपघात झाला. जहाजातील बिघाडामुळे ते उशिराने सुटल्याचे सांगण्यात येत आहे. रात्री उशिरापर्यंत ते इच्छित स्थळी पोहोचू शकले नाही. हा अपघात रात्री बारा वाजताच्या सुमारास घडला. बेपत्ता लोकांची संख्या अद्याप स्पष्ट झालेली नाही. बचावकार्य सुरू आहे. अपघाताची चौकशी केली जाणार आहे, जेणेकरून भविष्यात अशी दुर्घटना घडू नये.

झारखंडमधील साहिबगंज येथून बिहारमधील कटिहार येथे मालवाहू जहाजांद्वारे स्टोन चिप्स पाठवल्या जातात. गुरुवारी रात्री हे जहाज साहिबगंज घाटातून सुमारे दीड डझन लोड ट्रक घेऊन बिहारकडे रवाना झाले. नदीत जहाज अनियंत्रित झाले. जहाज किना-यावर आणणारे जहाजातील काही कर्मचारी सुरक्षित आहेत, मात्र 10 जणांचा अद्याप शोध लागलेला नाही.

एनडीआरएफकडून मदत मागितली
अपघाताची माहिती मिळताच साहिबगंज प्रशासन बचाव आणि मदतकार्यासाठी सक्रिय झाले आहे. एनडीआरएफकडून मदत मागवण्यात आली आहे. एनडीआरएफची एक टीम देवघरहून साहिबगंजला रवाना झाली आहे. साहिबगंज पोलीस ठाण्याचे प्रभारी यांनी अपघाताला दुजोरा दिला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

‘बार्टी’ कडून यूपीएससी-सीएपीएफ मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना २५ हजारांचे आर्थिक साहाय्य

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…

2 दिवस ago

महाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

2 दिवस ago

भटक्या प्राण्यांकरिता निवारा उभारणीसाठी जागा शोधण्याचे निर्देश

मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)…

2 दिवस ago

मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग ‘मिसिंग लिंक’ : वेग, सुरक्षितता आणि आधुनिक अभियांत्रिकीचा संगम

मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि…

2 दिवस ago

राज्यात सात जिल्ह्यांत एमआरआय सेवेचे लोकार्पण ; ११ जिल्ह्यांत मोफत डायलिसीस सेवेचा विस्तार

मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत, सात…

2 दिवस ago

फार्मर आयडी :२० मेपूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन, अन्यथा योजनांचा लाभ बंद

मुंबई : ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करून…

2 दिवस ago