देश

हाथरस प्रकरणी प्रियंका गांधींचे मोदी सरकारला प्रश्न

हाथरस : हाथरस प्रकरणात पीडितेच्या कुटुंबीयांना भेटल्यानंतर प्रियंका गांधी यांनी ट्विटच्या माध्यमातून त्यांच्या वतीने हे प्रश्न मोदी सरकारला आणि उत्तर प्रदेश सरकारला विचारले आहेत.

उत्तर प्रदेशातल्या हाथरस या ठिकाणी एका १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाला. या मुलीवर हल्लाही झाला तिची जीभ छाटण्यात आली. पीडित मुलीवर दिल्लीतल्या रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. २९ सप्टेंबरला उशिरा या पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी परस्पर मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेचा तीव्र निषेध देशभरातून होतो आहे.

दरम्यान हाथरस या ठिकाणी प्रियंका आणि राहुल गांधी हे पीडितेच्या कुटुंबीयांना सुरुवातीला भेटू दिलेलं नाही. तिथे राहुल गांधी यांना धक्काबुक्कीही करण्यात आली. या सगळ्या प्रकाराचा निषेध देशभरातून झाल्यानंतर तसंच या प्रकरणावरुन खूप टीका झाल्यानंतर प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली. या भेटीनंतर प्रियंका गांधी यांनी सरकारला काही प्रश्न विचारले आहेत.

  1. सुप्रीम कोर्टातर्फे संपूर्ण प्रकरणाची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे
  2. हाथरसच्या DM ना निलंबित केलं जावं, कोणतंही मोठं पद दिलं जाऊ नये
  3. आमच्या मुलीच्या मृतदेहावर आमची संमती न घेता पेट्रोल टाकून जाळण्यात का आला?
  4. आमची वारंवार दिशाभूल का केली जाते आहे? आम्हाला धमकावलं का जातंय?
  5. आम्ही माणुसकीच्या नात्याने चितेवरचे फूल आणले, पण आम्ही कसे मान्य करायचे की तो मृतदेह आमच्याच मुलीचा होता?

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

1 आठवडा ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

1 आठवडा ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

1 आठवडा ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

1 आठवडा ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

1 आठवडा ago

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…

1 आठवडा ago