उत्तराखंडमधील तपोवन परिसरात हिमकडा कोसळल्याने प्रचंड विनाश झाला आहे. हिमकडा कोसळल्यानंतर रैनीसह अनेक गावांना याचा तडाखा बसला आहे. ऋषीगंगा प्रकल्प वाहून गेल्याची माहिती आहे. तपोवन ऊर्जा प्रकल्पाला देखील फटका बसला आहे.
केंद्र सरकारने उत्तराखंडमध्ये नेव्ही गोताखोरांनाही बचावासाठी पाठवले आहे. जेणेकरून ते नदीत चांगल्या प्रकारे मदतकार्य करू शकतील. तसेच आतापर्यंत एनडीआरएफच्या 5 टीम उत्तराखंड येथे पाठविण्यात आल्या आहेत.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या बैठकीत केंद्रीय जल आयोगाने नदीची पाण्याची पातळी कमी होत असल्याची माहिती दिली आहे. केंद्रीय जल आयोगाने NCMC ला सांगितले की आजूबाजूच्या गावांना आता कोणताही धोका नाही. NCMC ने उत्तराखंडमध्ये केंद्र आणि राज्य सरकारच्या एजन्सींनी सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हवामान विभागाने राष्ट्रीय संकट व्यवस्थापन समितीला 2 दिवस पाऊस पडणार नाही, त्यामुळे बचावात कोणतीही अडचण येणार नाही, अशी माहिती दिली आहे. तसेच, पाण्याची पातळी सातत्याने कमी होत असल्यामुळे खालच्या गावांमध्ये देखील पूर येण्याचा धोका नाही.
DRDO चे हिमस्खलन तज्ञांचे पथकदेखील उत्तराखंडला गेले आहे. हिमस्खलन देखरेखीसाठी आणि आगाऊ चेतावणी देण्यासाठी डीआरडीओकडे एक विशेष पथक आहे. या डीआरडीओ पथकांना मदत, बचाव आणि नंतरच्या पुनर्वसन कार्यक्रमात मदतीसाठी पाठविण्यात आले आहे.
उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात हिमनदी फुटल्यामुळे बर्याच प्रमाणात नाश झाला आहे. हिमनग फुटल्यामुळे धौलीगंगा नदीला पूर आला. पाणी वेगाने वाहत आहे. आजूबाजूच्या भागात पुराचे पाणी पसरण्याची शक्यता लक्षात घेऊन आजूबाजूच्या भागातून लोकांना बाहेर काढले जात आहे. ITBP, NDRF आणि SDRG ची अनेक पथके घटनास्थळी दाखल झाली आहेत. श्रीनगर, ऋषिकेश आणि हरिद्वार येथे अलर्ट जरी करण्यात आलेला आहे. उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रसिंग रावत यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची माहिती घेतली आहे.
चमोलीतील तपोवन जवळ बोगद्यात अडकलेल्या सर्व 16 जणांना आयटीबीपीच्या जवानांनी वाचवले.
अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…
मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…
सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…
मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…