देश

शेतकरी आंदोलनामुळे एकाही शेतकऱ्याच्या मृत्यूची नोंद नाही, सरकारचे लोकसभेत उत्तर

नवी दिल्ली : कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात माहिती दिली आहे की कृषी कायद्यांविरोधात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे एकाही शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची नोंद कृषी मंत्रालयाकडे नाही. अशा परिस्थितीत मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना भरपाई देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

वास्तविक, सरकारला लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला होता की आंदोलनादरम्यान किती शेतकऱ्यांचा मृत्यू झाला याची आकडेवारी सरकारकडे आहे का आणि आंदोलनादरम्यान मारल्या गेलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकार भरपाई देणार का? तसे असल्यास सरकारने सविस्तर माहिती द्यावी आणि तसे नसेल तर सरकारने कारण द्यावे.

त्यावर उत्तर देताना कृषिमंत्री तोमर म्हणाले, हे आंदोलन संपवण्यासाठी सरकार आंदोलक शेतकऱ्यांशी सतत संपर्कात आहे. त्यासाठी सरकार आणि आंदोलक शेतकरी संघटनांमध्ये 11 स्तरावर बोलणीही झाली. संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सरकारने तिन्ही कृषी कायदे मागे घेतले आहेत. याशिवाय, कृषी खर्च आणि किंमत आयोगाच्या (कमीशन फॉर एग्रीकल्चर कॉस्ट्स एंड प्राइस) सल्ल्यानुसार, सरकारने 22 पिकांचे एमएसपी घोषित केले आहेत. एमएसपीवर खरेदीसाठी केंद्र आणि राज्य पातळीवरील एजन्सी सरकारच्या विविध योजनांतर्गत पीक खरेदी करत आहेत.

सरकारने कृषी आंदोलनात एकाही शेतकऱ्याचा मृत्यू झाला नसल्याचा दावा केला असला, तरी गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सुमारे 700 शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा दावा शेतकरी संघटना करत आहेत. इतकेच नाही तर शेतकरी संघटना त्यांच्या अटींमध्ये या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना नुकसान भरपाई देण्याची मागणीही करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago