major vibhuti dhoundiyal martyred in pulwama attack his wife nikita dhoundiyal joins indian army
जम्मू-काश्मीरच्या पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले मेजर विभूती शंकर धौंडियाल यांची पत्नी नितिका कौल आज भारतीय सैन्यात दाखल झाली आहे. सैन्यात भरती झाल्यानंतर त्या आता ‘लेफ्टनंट नितिका धौंडियाल’ बनल्या आहेत. नितीका यांनी आज भारतीय सैन्याचा गणवेश परिधान करून हुतात्मा मेजर विभूती शंकर यांना श्रद्धांजली वाहिली. मेजर विभूती फेब्रुवारी 2019 मध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झाले होते.
18 फेब्रुवारी 2019 रोजी, जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे मेजर धोंडीयाल यांना वीरमरण आले होते. 14 फेब्रुवारी 2019 रोजी पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात 40 जवान शहीद झाले होते. या हल्ल्यानंतरच सैन्याने पुलवामाच्या पिंगलान गावात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी मोहीम राबविली होती. त्यावेळी पिंगलानमध्ये झालेल्या चकमकीत चार जवान ठार झाले. या शहीद झालेल्या जवानांमध्ये मेजर विभूती धोंडियाल यांचादेखील समावेश होता.
मेजर धोंडियाल आणि नितीका यांचे लग्न होऊन तेव्हा केवळ 10 महिने झाले होते. त्यावेळी आपल्या पतीला शूर सैनिक म्हणत नितीका कौल म्हणाल्या होत्या कि, “मला पूर्ण विश्वास आहे की माझे पती मेजर विभूती यांना आलेलं वीरमरण अनेक जणांना सैन्यात सामील होण्यासाठी प्रेरणा देईल.”
मेजर विभूती शंकर धौंडियाल यांचे पार्थिव त्यांच्या गावी पोहोचले, तेव्हा त्यांची पत्नी नितिका यांनी त्यांच्या पार्थिवाजवळ उभी राहून त्यांना सॅल्यूट केला होता. त्यावेळी नितीका म्हणाल्या होत्या कि, “तुम्ही मला खोटे सांगितले होते की तुम्ही माझ्यावर प्रेम करता. तुम्ही माझ्यावर नाही, तर आपल्या देशावर जास्त प्रेम करत होता आणि मला त्याचा अभिमान आहे.” माध्यमांशी बोलताना नितिका म्हणाल्या होत्या की मी बिचारी व्यक्ती नसून शूर हुतात्माची पत्नी आहे आणि मला माझे पती शहीद झाले त्याचा अभिमान आहे.
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…
मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे.…
मुंबई : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य…
नवी दिल्ली : नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये…
मुंबई : महिलांवरील अत्याचार, छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे अधिक…