Madhya Pradesh tragic Accident While Putting Flag On Maharajas Building 3 Employees Killed, One Injured
ग्वालियर : ग्वालियरमध्ये महाराजा बाडा येथील जुन्या पोस्ट ऑफिसवर तिरंगा लावताना मोठा अपघात झाला. शनिवारी सकाळी ग्वालियरमधील 60 फूट उंच पोस्ट ऑफिस इमारतीत राष्ट्रध्वजाची दोरी बदलत असताना हा अपघात झाला. यामध्ये 3 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून 1 जण गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ध्वजाची दोरी बदलण्यासाठी कामगार क्रेनवर चढले होते. त्याचवेळी अचानक क्रेनचा जॅक उखडला आणि क्रेनची ट्रॉली उलटली. ट्रॉलीमध्ये 4 कामगार होते. ते सर्वजण पहिल्या मजल्यावरील छतावर पडले. मृतांपैकी दोन नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे कर्मचारी आहेत तर एक पोस्ट ऑफिसचा चौकीदार आहे. अपघातानंतर तेथे उपस्थित लोकांनी घाईघाईने चारही कर्मचाऱ्यांना जय आरोग्य हॉस्पिटलच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेले, जिथे तीन जणांना मृत घोषित करण्यात आले. माहिती मिळताच प्रभारी मंत्री तुळशीराम सिलावटही घटनास्थळी पोहोचले. या घटनेनंतर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे.
शहरातील महाराज बाडामध्ये दरवर्षी स्वातंत्र्यदिनी ऐतिहासिक वास्तूंची रोषणाई आणि सजावट केली जाते. जुन्या पोस्ट ऑफिसवर ध्वज फडकवला जातो. येथे ध्वज लावण्यात आला होता, परंतु त्याची दोरी खराब झाली होती. ती दुरुस्त करण्यासाठी पोस्ट ऑफिसचे चौकीदार विनोदकुमार शर्मा यांनी पालिका कार्यालयात माहिती दिली होती. अग्निशमन दलाचे जवान 52 मीटर उंचीची मोठी क्रेन घेऊन बाडा येथे पोहोचले होते.
क्रेन बाजूला उभी करून तिच्या ट्रॉलीमध्ये अग्निशमन दलाचे कर्मचारी प्रदीप राजौरीया, कुलदीप दंडौटिया, पोस्ट ऑफिसचे चौकीदार विनोद शर्मा यांच्यासह चार जण उभे होते. ते ट्रॉलीवर चढलेच होते तेवढ्यात क्रेन ज्यावर उभी होती, तो जॅक तुटला आणि क्रेन उलटली. क्रेन उलटली तेव्हा ट्रॉलीसह सर्व कामगार खाली पडले. स्थानिक लोकांनी पातंजल घटनेची माहिती पोलीस, महापालिकेला दिली. पोलीस तेथे पोहोचले आणि त्यांनी लोकांच्या मदतीने जखमींना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून जेएएचच्या ट्रॉमा सेंटरमध्ये नेले.
अपघातात डोक्याला दुखापत झाल्याने प्रदीप राजौरीया, विनोद कुमार शर्मा आणि कुलदीप दंडौटिया यांचा मृत्यू झाला. तर 3 कर्मचाऱ्यांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, या घटनेनंतर मनपाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मृत्यूबद्दल संताप व्यक्त केला. त्यांचा पालिका अधिकाऱ्यांशी वादही झाला.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…