Farmers
नवी दिल्ली : केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा केली आहे. अल्पमुदतीच्या कर्जांना मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना स्वस्तात कर्ज मिळेल. एवढेच नाही तर मंत्रिमंडळाने व्याज सवलत योजनाही जाहीर केली आहे. याद्वारे शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतच्या अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याजात 1.5 टक्के सूट मिळणार आहे.
ज्या शेतकऱ्यांनी अल्प मुदतीसाठी 3 लाख रुपयांचे कर्ज घेतले आहे त्यांना व्याजात सवलत मिळणार आहे. त्यांना व्याजावर १.५ टक्के सूट मिळेल. यासोबतच शेतकऱ्यांना माफक व्याजदरात कर्ज मिळेल, जेणेकरून त्यांना शेतीची कामे व्यवस्थित करता येतील, असे सरकारने म्हटले आहे.
सहकारी संस्था आणि बँकांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अल्प आणि दीर्घ मुदतीसाठी सरकारकडून कमी व्याजदरात कर्ज दिले जाते. अनेक शेतकरी या कर्जाची वेळेवर परतफेड करतात तर अनेक शेतकरी काही कारणास्तव कर्जाची वेळेवर परतफेड करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत जे शेतकरी कर्जाची वेळेवर परतफेड करतात, अशा शेतकऱ्यांनाच व्याज सवलत योजनेचा (इंटरेस्ट सबव्हेंशन स्कीम) लाभ मिळेल.
क्रेडिट कार्डसह स्वस्त कर्ज मिळवा
सध्या सरकार किसान क्रेडिट कार्ड अंतर्गत कमी व्याजदरावर कर्ज देते. ज्या शेतकऱ्यांकडे क्रेडिट कार्ड नाही ते त्यांच्या त्यांचे किसान क्रेडिट कार्ड (KCC) बनवू शकतात. जर एखाद्या शेतकऱ्याने किसान क्रेडिट कार्डद्वारे कर्ज घेतले तर त्याला 4% व्याजाने तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळते. एवढेच नाही तर पीएम किसान सन्मान निधीचा लाभ किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातूनही उपलब्ध आहे.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…