India should give true figures of corona patients and deaths: WHO
जिनिव्हा : भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने गंभीर परिस्थिती निर्माण केली आहे. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटना भारतातील कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. भारतात कोरोना संसर्गाचे प्रमाण आणि मृतांची संख्या चिंताजनक असून भारत सरकारने कोरोनाबाधितांची खरी आकेडवारी समोर आणण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी म्हटले आहे.
डॉ. सौम्या स्वामीनाथन यांनी मुलाखतीत म्हटले कि, “इन्स्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्यूशन (IHME) यांनी ऑगस्टपर्यंत भारतात १० लाख कोरोनाबाधितांचा मृत्यू होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. सध्या भारताची स्थिती अतिशय चिंताजनक आहे. भारतातील कोरोनाबाधित आणि मृतांची संख्या ही दक्षिण-पूर्वेकडील देशांपेक्षाही जास्त आहे. भारताने आणि जगातील इतर देशांनीही कोरोनाबाधितांची आणि मृतांची खरी आकेडवारी जाहीर करण्याची आवश्यकता आहे. भारतात आढळलेला कोरोना विषाणूचा वेरिएंट अधिक जलदपणे फैलावत आहे. भारतात आढळलेला B.1.617 हा वेरिएंट जागतिक चिंतेचा विषय आहे.” अशा प्रकारचा हा चौथा वेरिएंट असल्याचे डॉ. स्वामीनाथन यांनी सांगितले आहे.
डॉ. स्वामीनाथन पुढे म्हणाल्या की आपल्याला विज्ञान आणि डेटाच्या आधारे आपली धोरणे सतत बदलत राहावी लागतील. तसेच विशिष्ट निर्णय का घेतले जात आहेत आणि त्यामागील कारणे काय आहेत? याविषयी लोकांना समजावून सांगितले पाहिजे. त्यांनी डब्ल्यूएचओ वैज्ञानिकांना देखील डेटामध्ये पारदर्शकता आणण्याचे आवाहन केले.
भारत सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी झुंज देत आहे. या लाटेने देशातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांवर ताण निर्माण केला आहे आणि फ्रंटलाइन वैद्यकीय कर्मचार्यांवर देखील याचा खूप ताण पडत आहे.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…