कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. हे देखील स्पष्ट झाले आहे की हा प्रकार अधिक वेगाने पसरत आहे. परंतु, त्याची घातकता कमी आहे. म्हणजेच, यातून गंभीर आजारी पडण्याचा आणि मृत्यूचा धोका डेल्टा आणि इतर प्रकारांपेक्षा खूपच कमी आहे. असे असूनही, ओमिक्रॉनची भीती कायम आहे आणि जगभरातून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. अशाच एका प्रयत्नाला आता यश मिळताना दिसत आहे. आतापर्यंत मानले जात होते की सध्याच्या लस ओमिक्रॉनवर कुचकामी आहेत, परंतु, अभ्यासात आढळून आले की तिसरा डोस Omicron विरुद्ध प्रतिकारशक्ती 88 टक्क्यांपर्यंत वाढवू शकतो.
ब्रिटनमध्ये केलेल्या अभ्यासानुसार, कोरोना लसीचा तिसरा डोस, ज्याला भारतात सावधगिरीचा डोस (precautionary dose) म्हटले जात आहे, तो प्रभावी ठरू शकतो. या अभ्यासानुसार, तिसरा डोस Omicron विरुद्ध प्रतिकारशक्ती 88 टक्क्यांपर्यंत वाढवू शकतो. यापूर्वीच्या अनेक संशोधनातून असे दिसून आले आहे की, कोविडची लस घेतल्यानंतर 6 महिन्यांनंतर त्यातून निर्माण झालेली प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ लागते. अशा परिस्थितीत ओमिक्रॉन व्हेरियंटच्या आगमनाने लोक घाबरले होते. मात्र या अभ्यासाने दिलासा निर्माण केला आहे.
ब्रिटीश अभ्यासानुसार, तिसरा म्हणजे बूस्टर डोस म्युटंट कोरोना वेरिएंट (ओमिक्रॉन) विरूद्ध चांगले संरक्षण प्रदान करू शकतो. डॉ. एरिक टोपोल, स्क्रिप्ट रिसर्च ट्रान्सलेशन इन्स्टिट्यूटचे संचालक आणि मॉलिक्युलर औषधांचे प्राध्यापक यांनी UKHSA अहवाल शेअर करत सांगितले की कोरोना लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर सुमारे 6 महिन्यांनंतर, ओमिक्रॉन या नवीन प्रकाराविरूद्ध त्याची कार्यक्षमता केवळ 52 टक्क्यांपर्यंत उरते. अशा परिस्थितीत, बूस्टर डोस पुन्हा एकदा 88 टक्क्यांपर्यंत प्रतिकारशक्ती वाढवते.
बूस्टर डोस घेतल्यामुळे प्रतिकारशक्ती तर वाढतेच, त्याचबरोबर कोरोना संसर्गाचा धोका देखील कमी होतो, तसेच ओमिक्रॉन असल्यास गंभीर लक्षणे देखील उद्भवत नाहीत. एवढेच नाही तर ओमिक्रॉनची बाधा झाली तरी रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे लागत नाही. तिसरा डोस घेणाऱ्यांना रुग्णालयात दाखल होण्याचा धोका देखील लस न घेतलेल्या लोकांपेक्षा 81 टक्के कमी असतो.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…