देश

पश्चिम बंगालमध्ये वीज कोसळल्याने 20 जणांचा मृत्यू, पंतप्रधानांनी जाहीर केली मदत

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमधील दक्षिण भागात तीन जिल्ह्यांमध्ये वीज कोसळल्याने 20 जणांचा मृत्यू झाला आहे. मुर्शिदाबाद आणि हुगली येथे प्रत्येकी नऊ आणि पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वीज कोसळून जीव गमावलेल्यांबद्दल दुःख व्यक्त केलं असून पंतप्रधानांच्या राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या आणि जखमींच्या कुटुंबियांना मदतीची घोषणा केली आहे.

आपत्ती व्यवस्थापन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, मुर्शिदाबाद जिल्ह्यात वीज कोसळल्याने आणखी तीन लोक जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी जंगीपूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कोलकातासह दक्षिण बंगालच्या जिल्ह्यांमध्ये दुपारपासूनच मुसळधार पाऊस पडला. हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचे हवामान खात्याने सांगितले.

पंतप्रधान मोदींनी या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत ट्वीट केले की, “पश्चिम बंगालमध्ये वीज कोसळल्यामुळे मृत्यू झालेल्यांच्या प्रियजनांबद्दल मी संवेदना व्यक्त करतो. आशा आहे की या घटनेत जखमी झालेले लवकर बरे होतील.”

पीएमओने ट्विट करून या घटनेत मृत्यू झालेल्या आणि जखमी झालेल्यांच्या कुटुंबियांना नुकसान भरपाई जाहीर केली आहे. यात मृतांच्या कुटूंबाला प्रत्येकी दोन लाख रुपये आणि जखमींना 50 हजार रुपयांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

1 आठवडा ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

1 आठवडा ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

1 आठवडा ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

1 आठवडा ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

1 आठवडा ago

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…

1 आठवडा ago