Shiv Sena Leader Chandrakant Khaire Warns Arnab Goswami
मुंबई : अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली होती. बुधवारी गोस्वामी यांची जामिनावर सुटका झाली. याप्रकरणी बोलताना शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी एकप्रकारे अर्णब यांना इशारा दिला आहे.
अर्णब गोस्वामी यांना बुधवारी सु्प्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला. जामिनावर सुटल्यानंतर अर्णब यांनी तळोजा कारागृहाबाहेर जमलेल्या गर्दीपुढे वंदे मातरम, भारत माता की जय अशा घोषणा दिल्या. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले कि, ‘उद्धव ठाकरे यांचा पराभव झाला आहे. त्यांनी मला जुन्या प्रकरणात अटक करायला लावली आणि माझी माफीही मागितली नाही. खरा खेळ तर आता सुरू झाला आहे. मी आता प्रत्येक भाषेत रिपब्लिक टीव्ही सुरू करणार आहे. मी तुरुंगात असलो तरी वाहिनी सुरू करेन. तुम्ही काहीच करू शकणार नाही.’
त्यावर शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी माध्यमांशी बोलताना अर्णब यांना इशारा दिला आहे. ते म्हणाले, “सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा मी आदर करतो. सुप्रीम कोर्टाने अर्णब यांना तात्पुरता जामीन दिला आहे, असे नमूद करतानाच अर्णब यांच्या बोलण्याच्या पद्धतीवर खैरे यांनी निशाणा साधला. अर्णब यांच्या अँकरिंगची भुंकण्याशी तुलना करत त्यांना किती बोलायचे ते बोलू दे. त्याने काहीच फरक पडणार नाही. आमच्यासारखे शिवसैनिक महाराष्ट्रात आहेत आणि त्यांनाही महाराष्ट्रातच राहायचे आहे, इतके फक्त ध्यानात राहू द्या.”
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…