The body of a person
मुंबई : पालघरमध्ये चालत्या ट्रेनच्या टॉयलेटमध्ये महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. तिच्या गळ्यात कापडाचा फास असल्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र, हा मृत्यू संशयास्पद वाटत आहे. 8 मे रोजी दुपारी ही घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिहारची राहणारी 20 वर्षीय आरती कुमारी पाल रविवारी मुंबईच्या वांद्रे टर्मिनस येथून स्वराज एक्स्प्रेसमध्ये चढली. ट्रेन जम्मू तवीला जात होती आणि महिला बोगी क्रमांक 4 मध्ये चढली होती. काही वेळाने महिला शौचालयात गेली, मात्र बराच वेळ ती पुन्हा जागेवर न आल्याने लोकांना संशय आला. त्यांनी स्वच्छतागृहाचा दरवाजा ठोठावला. मात्र बराच वेळ होऊनही महिलेने दरवाजा उघडला नाही. बराच वेळ दरवाजा न उघडल्यानंतर लोकांनी ही बाब टीसीला कळवली. टीसीनेही दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही. त्यानंतर दुपारी १.१० च्या सुमारास पालघरच्या डहाणू रोड रेल्वे स्थानकावर रेल्वे थांबवण्यात आली. पोलिसांच्या मदतीने दरवाजा उघडला असता महिलेचा मृतदेह जमिनीवर पडलेला आढळून आला. तिच्या गळ्यात कापडाचा फास बांधला होता.
पोलिसांनी आधारकार्डवरून महिलेची ओळख पटवली आणि तपासाअंती महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पालघरमधील डहाणू येथील कॉटेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. पोलीस आता पोस्टमार्टम रिपोर्ट येण्याची वाट पाहत आहेत. पीएमचा अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल, अशी आशा पोलिसांना आहे. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला ट्रेनमध्ये चढली तेव्हा तिच्यासोबत एक मुलगा आणि एक पुरुषही उपस्थित होते, परंतु मृतदेह सापडण्यापूर्वीच दोघेही बेपत्ता झाले होते. महिलेसोबत ट्रेनमध्ये चढलेला पुरुष आणि मूल कोण होते आणि महिलेचा मृत्यू होण्यापूर्वी ते अचानक कसे गायब झाले, याचाही शोध घेण्याचा पोलिस प्रयत्न करत आहेत.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…