Warakaris tragic accident in Dindi 5 killed 30-40 injured
सोलापूर : सोलापूर येथे रविवारी वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला भीषण अपघात होऊन 5 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वारकऱ्यांच्या दिंडीच्या ट्रॅक्टरला ट्रकने मागून धडक दिल्याने हा अपघात घडल्याचे बोलले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तुळजापूर तालुक्याच्या कदमवाडी येथील रहिवासी असलेल्या वारकऱ्यांच्या ट्रॅक्टरला मालट्रकने मागून धडक दिली. यात 6 जण गंभीर जखमी झाले असून, 4 जणांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. मृतांमध्ये 2 पुरुष, एक महिला आणि एका लहानग्याचा समावेश आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील कोंडी जवळ हा अपघात घडला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी धाव घेत जखमी आणि मृतांना बाहेर काढले आणि रुग्णालयात हलवण्यात आले. कदमवाडी येथील हे 30 ते 40 वारकरी सोमवारी एकादशी असल्याने त्यानिमित्त पंढरपूर येथे दर्शनासाठी निघाले होते. मात्र त्यादरम्यान त्यांच्यावर काळाने घाला घातला.
अद्याप या अपघातातील मृतांची नावे समजली नाहीत. तसेच जखमींमध्ये समावेश असलेल्या एका किशोरवयीन मुलासह चार महिलांचीही नावे समजली नाहीत. राम शिंदे (वय ३०), मच्छिंद्र गोरे (वय ५६), आनंद मिसाळ (वय ६०), समाधान शिवाजी कदम (वय ४०), आकाश किसन गिरी (वय ६५), मंदा कदम (वय ५०), सुलभा साळुंखे (वय ५०), जयश्री साळुंखे (वय ५०), नागनाथ साळुंखे (वय ४०), समर्थ साळुंखे (वय १६), निर्मला कदम (वय ४०), शीतल शिंदे (वय ३५), शुभम अंकुश शिंदे (वय १५), समर्थ अंगद मिसाळ (वय ६) अशी ओळख पटलेल्या अन्य जखमींची नावे आहे.
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…