Class 10 student suicide due to teacher harassment
सांगली : राजधानी दिल्लीतील सेंट कोलंबस शाळेच्या प्राचार्या आणि शिक्षिकांनी दिलेल्या मानसिक छळाला कंटाळून दहावीमध्ये शिकत असलेल्या एका मराठी विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी घडली. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ढवळेश्वर येथील रहिवासी असलेल्या मुलाने राजेंद्रनगर मेट्रो स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून खाली रस्त्यावर उडी मारून आपले जीवन संपवले.
सोने–चांदी गलाई व्यवसायानिमित्त या मुलाचे वडील श्रीयुत पाटील हे अनेक वर्षांपासून दिल्लीमध्ये स्थायिक आहेत. त्यामुळे हा मुलगा कुटुंबीयांसह राजीव नगर परिसरात राहत होता. तो सेंट कोलंबस विद्यालयात इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होता.
मानसिक छळामुळे टोकाचा निर्णय
१८ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. शरदने दीड पानांची सुसाइड नोट लिहून शिक्षिकांनी सतत मानसिक छळ केल्यामुळे आत्महत्या करत असल्याचे नमूद केले. “स्कूलवालों ने इतना बोला की मुझे यह करना पड़ा… मम्मी सॉरी… भैय्या सॉरी…” असे भावनिक शब्द त्याने लिहिले होते. तसेच, गरज पडल्यास आपले अवयव दान करावेत, अशीही त्याची अंतिम इच्छा त्यात नमूद होती.
चार शिक्षिकांविरुद्ध गुन्हा दाखल
घटनेची माहिती मिळताच राजा गार्डन मेट्रो पोलिसांनी तत्काळ तपास सुरू केला. जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी सुसाइड नोटच्या आधारावर शाळेच्या प्राचार्या अपराजिता पाल तसेच शिक्षिका मनू कालरा, युक्ती महाजन आणि ज्युली व्हर्गिस यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदवला आहे.
गावात शोककळा; आज अंत्यसंस्कार
घटनेच्या वेळी शरदचे वडील ढवळेश्वर येथे कामानिमित्त आले होते. घटनेची माहिती मिळताच ते तातडीने दिल्लीला रवाना झाले. मृत मुलाचे पार्थिव मूळगावी आणण्यात आले असून आज त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. या सर्व प्रकारामुळे ढवळेश्वर गावासह सर्वत्र शोककळा पसरली आहे.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…