महाराष्ट्र

राज्य सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने बघण्याची गरज

दूध व्यवसाय करण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते. यात शेतकऱ्यांना खूप खर्च देखील करावा लागतो. पशूंचा चारा, त्यांचे लसीकरण, त्यांच्या आरोग्यविषयक गरजा, त्यांना लागणारी पेंड या सगळ्याचे व्यवस्थापन केल्यानंतर दुधाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

राज्य शासनाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडल्याचे मत शेतकरी व्यक्त करत आहेत. शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करतात. कोरोनामुळे संचारबंदी लागू केल्याने शेती उत्पादनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जनावरे सांभाळून कुटुंबाची उपजीविका करणारे शेतकरी आता अडचणीत आले आहेत. कारण गेल्या चार-पाच महिन्यांपासून दुधाला दर मिळत नाही. कोरोनाची संचारबंदी उठल्यानंतर तरी शेतीमाल व दुधाला दरवाढ मिळेल या अपेक्षेवर शेतकरी बसले आहेत. सध्या दुधाला प्रती लिटर १५-16 रुपये दर मिळतो, तो वाढवून 27 रुपये प्रती लिटरपर्यंत करावा अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे.

राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने बघण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मेहनतीचा योग्य मोबदला मिळायला हवा. सरकारकडून आतातरी शेतकऱ्यांसाठी महत्वाचे निर्णय घेतले जातील अशी अपेक्षा आहे.

 

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago