Corona outbreak! Over 2 lakh corona patients in 24 hours
मुंबई : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतून राज्य सावरल्यानंतर मास्कची सक्ती काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, देशातील काही राज्यांमध्ये पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने राज्यात पुन्हा मास्कसक्ती करण्यात यावी, असा प्रस्ताव राज्य टास्क फोर्सने मुख्यमंत्र्यांकडे दिल्याची माहिती मिळाली आहे.
येत्या जून महिन्याच्या सुरुवातीला कोरोनाची लाट येण्याची शक्यताही वर्तविण्यात आली असून लसीकरणाचा वेग वाढविण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. ‘महाराष्ट्र राज्य टास्क फोर्स’च्या सदस्यांची विशेष बैठक सोमवारी पार पडली. या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर टास्क फोर्सच्या सदस्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्यात आवश्यक असलेल्या उपाययोजनांचा एक प्रस्ताव सादर केला. ज्यात प्रामुख्याने राज्यात मास्कचा वापर वाढविणे, लसीकरणाला आणखी वेग देणे, रुग्णांचा शोध घेणे, जिनोम सिक्वेन्सिंगवर भर देणे आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
कोरोनाचा धोका लक्षात घेता मास्कचा वापर आवश्यकच असून किमान बंदिस्त ठिकाणी मास्क घालणे बंधनकारक करावे, असे टास्क फोर्स सदस्यांचे म्हणणे आहे. विशेषतः चित्रपटगहे, नाट्यगृहे, मॉल्स अशा ठिकाणी संसर्गाचा धोका लक्षात घेऊन या ठिकाणी मास्कसक्ती करावी, असे मत या सदस्यांनी व्यक्त केले आहे. त्याचबरोबर खासगी आणि सरकारी रुग्णालयातही तातडीने मास्कचा वापर प्राधान्याने सुरू करण्याविषयी सूचना देण्यात आल्याचे कळते. या बैठकीत टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी तसेच इतर सदस्य उपस्थित होते.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…