महाराष्ट्र

केंद्रीय पथकाने सांगितली राज्यातील कोरोना संसर्ग पुन्हा वाढण्याची कारणे, सुचवले ‘हे’ उपाय

मुंबई : महाराष्ट्र आणि मुंबईत कोरोनाचा प्रसार पुन्हा एकदा वाढत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी करून करून असं का घडलं, याची पाहणी केली. त्यानंतर केंद्रीय पथकाने याला जबाबदार असणाऱ्या कारणांबद्दलचा अहवाल तयार केला आहे.

यात प्रामुख्याने लोकलमधील गर्दी, लोकांचा निष्काळजीपणा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, लग्न समारंभ, सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये झालेली वाढ आणि लोकल तसेच सार्वजनिक वाहतूक सुरु केली, यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढला असं केंद्रीय पथकाने अहवालात नमूद केलं आहे. आरोग्य यंत्रणा आता गांभीर्याने काम करत नसल्याचं देखील केंद्रीय पथकाने म्हटलं आहे.

केंद्रीय पथकाने सुचवलेले उपाय :

  1. राज्य सरकारने कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी.
  2. रुग्णांचा शोध घ्यावा.
  3. कोरोना संबंधीच्या नियमांचे काटेकोरपण पालन केले पाहिजे.
  4. काँटॅक्ट ट्रेसिंगवर भर द्यावा.
  5. लसीकरण सुरू ठेवावे.

काल (7 मार्च) महाराष्ट्रात 11,141 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर दिवसभरात 6013 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 97,983 झाली आहे. राज्यात एकूण 52, 478 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

4 दिवस ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

4 दिवस ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

4 दिवस ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 आठवडा ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

3 आठवडे ago