ठाणे

ठाण्यात खळबळ! घरगुती वादातून स्वतःची पत्नी आणि दोन मुलींना जिवंत जाळले, आग लागल्याचा केला बनाव, मात्र…

ठाणे : डोंबिवली येथे घरगुती वादातून एका व्यक्तीने पत्नी आणि दोन मुलींना रॉकेल ओतून जिवंत जाळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत आरोपीही होरपळला गेला. दरम्यान, घटनेनंतर या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे आरोपीची पत्नी आणि त्यांच्या दोन मुलींचा मृत्यू झाला. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाची चौकशी सुरु केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसाद पाटील हे पत्नी प्रीती आणि दोन मुलींसोबत डोंबिवलीतील भोपर परिसरात राहत होते. प्रसाद हा त्याच्या पत्नीचा अनेकदा शारीरिक आणि मानसिक छळ करत होता. दरम्यान, शनिवारी सकाळी प्रसाद यांच्या घराला आग लागली, यात प्रसाद, त्याची पत्नी प्रीती आणि दोन मुली भाजल्या. त्यानंतर या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. रविवारी उपचारादरम्यान प्रितीचा मृत्यू झाला. तर सोमवारी सकाळी दोन्ही मुलींचाही मृत्यू झाला. प्रसादवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या घटनेचा तपास मानपाडा पोलीस करत होते. कौटुंबिक वादातून प्रसादने पत्नी प्रीतीला पेटवून दिल्याचे तपासात समोर आले आहे. प्रसादने प्रीतीला जीवे मारण्याच्या उद्देशाने पेटवून दिल्याचे पोलिसांनी सांगितले. तिच्या मुलींचाही आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेनंतर गुन्हेगाराने पोलिसांची दिशाभूल केली. घराला आग लागल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, पोलिसांना संशय आला आणि त्यांनी प्रसादची कठोरपणे चौकशी केली असता सत्य समोर आले. तक्रारदार किशोर पाटील यांच्या फिर्यादीवरून मानपाडा पोलिसांनी प्रसाद पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

4 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

1 महिना ago