ठाणे

ठाण्यात घरांवर दरड कोसळून मोठी दुर्घटना, ३ मुलांसह 5 जणांचा मृत्यू

ठाणे : ठाणे महानगरपालिका हद्दीतील कळवा पूर्व इथे डोंगर परिसरात दरड कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे तर काही जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कळवा पूर्व येथील घोळाई नगर डोंगर परिसरात घरांवर दरड कोसळल्याने चार घरांचे नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाकडून घटनास्थळी बचाव आणि शोधकार्य सुरू आहे.

या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली असून यात तीन लहान मुलांचा समावेश आहे. यात रविकिशन (12 वर्षे), सिमरन (10 वर्षे) आणि संध्या (३ वर्षे) यांचा समावेश आहे. प्रभू यादव (वय 45) आणि विद्यावती (वय 40) यांचाही मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. 5 वर्षांची प्रीती आणि 18 वर्षीय अचल यांना वाचवण्यात यश मिळाले आहे.

दरम्यान, मागील तीन दिवसांपासून ठाण्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. ठाण्यानजीक असणारा मासूंदा तलाव ओसंडून वाहू लागला आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचून पुरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्यानं वाहतूकीचे मार्ग बदलण्यात आले आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

3 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago