Supriya Sule
पुणे : राज्य सरकारने राज्यातील निर्बंध बऱ्याच प्रमाणात शिथील केले आहेत. कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वांना मुंबई लोकलमधून प्रवासाची परवानगीही मिळाली आहे. मात्र, राज्यात अन्य ठिकाणी रेल्वे प्रवासावर अद्यापही निर्बंध आहेत. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी याकडे सरकारचे लक्ष वेधले आहे.
१५ ऑगस्टपासून कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वांना लोकल प्रवासाची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली. त्यामुळे सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. मात्र, राज्यात अन्य ठिकाणी रेल्वे प्रवासावर अद्यापही निर्बंध आहेत. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी ट्वीट केलं आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या कि, “कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या सर्वांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे. परंतु राज्यातील अनेक ठिकाणी नागरिकांना नोकरी-व्यवसाय, शिक्षण व इतर कारणांसाठी रेल्वेनं प्रवास करावा लागतो. परंतु सध्या त्यांना परवानगी नसल्यामुळं त्यांची अडचण होत आहे. हे लक्षात घेऊन दोन डोस घेतलेल्या नागरिकांना राज्यात इतरत्रही रेल्वेनं प्रवास करण्याची परवानगी देण्याबाबत कृपया सकारात्मक निर्णय घ्यावा,” अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…